Festival Posters

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगारांच्या अर्थसहाय्येसाठी कोणत्याही कागदपत्राची आवश्यकता नाही

Webdunia
शुक्रवार, 24 एप्रिल 2020 (07:26 IST)
मुंबई – राज्यात कोरोनाविरोधात लढण्यासाठी लॉकडाऊन जारी आहे. त्यामुळे अनेकांचा रोजगार बुडाला आहे. हातावर पोट असणाऱ्या अनेक कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. मात्र त्यांना दिलासा म्हणून त्यांच्या खात्यात दोन हजार रुपये टाकण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी बांधकाम मंजुरांना कोणताही अर्ज, बँकेचा तपशील, आधार क्रमांक देण्याची आवश्यकता नाही, असे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून सांगण्यात आले आहे.
 
या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही संघटना, संस्था किंवा व्यक्ती यांच्याकडून फसवणूक झाल्यास त्यांची कामगार विभाग किंवा पोलिसात तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कामगाराची फसवणूक केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे.
 
जिल्हा कार्यलयस्तरावर गर्दी होऊ नये म्हणून मंडळाच्या मुंबई येथील मुख्यालयातून राज्यातील नोंदीत सक्रीय बांधकाम कामगारांना थेट पद्धतीने रकमेचे वाटप केले जाणार आहे. जिल्हा कार्यालयाकडून सर्व नोंदीत सक्रीय बांधकाम कामगारांची यादी आणि बँकेचा तपशील मंडळ स्तरावर मागवून अर्थसहाय्य वाटप करण्यात येत असून त्याला मंडळाच्या मुख्यालय स्तरावरून २० एप्रिलपासून सुरुवात झाल्याचे सांगण्यात आले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मास कधीपर्यंत असेल? या पवित्र महिन्यात या ५ शुभ गोष्टी केल्यास तुमचे भाग्य उजळेल

देवाला अर्पण केलेल्या वस्तूंचा पुनर्वापर करता येतो का? जाणून घ्या शास्त्रानुसार याचे नियम

Career in BSc in Respiratory Therapy : बीएससी इन रेस्पिरेटरी थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

त्वचेसाठी तुरटीचे हे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

महागड्या स्प्रेपेक्षा घरगुती उपाय जास्त प्रभावी; आरसे स्वच्छ करण्याची योग्य आणि सोपी पद्धत येथे पहा

सर्व पहा

नवीन

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजकीय खळबळ; पार्थ पवार यांनी प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांचा बचाव केला, आरोप निराधार असल्याचे म्हटले

LIVE: जगातील दुसरे सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम मुंबईत उभारले जाणार

मुंबई : मालाडमध्ये 'ऍसिड होळी'; कामगारांमधील संघर्षात अनेक जण जखमी

हवामान विभागाने महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट आणि गारपिटीचा गंभीर इशारा दिला

पुण्यात अवकाळी पावसाचे थैमान; जनजीवन विस्कळीत तर खडकवासला येथे सर्वाधिक ८८ मिमी पावसाची नोंद

पुढील लेख
Show comments