Dharma Sangrah

Omicron BF.7 in India:राज्यात नव्या व्हॅरिएंटची एंट्री,तज्ञांचा इशारा

Webdunia
बुधवार, 19 ऑक्टोबर 2022 (12:17 IST)
देशातील कोरोना विषाणूच्या प्रकरणांमध्ये सातत्याने घट होत असल्याने, बहुतेक निर्बंध हटवले जात होते. पण अलीकडेच कोरोनाच्या एका नव्या व्हेरियंटने पुन्हा सर्वांच्याच चिंता वाढवल्या आहेत. रिपोर्ट्सनुसार, कोरोनाचे हे नवीन व्हेरियंट ओमिक्रॉनचे सब-व्हेरियंट आहे. त्याचे नाव BA.5.1.7 आहे आणि हा विषाणू खूप वेगाने पसरतो.राज्यात देखील पुण्यात BQ1 च पहिलं प्रकरणं समोर आलं असून  हे व्हेरियंट BA.5.1.7 चे सब-व्हेरियंट आहे. महाराष्ट्र आरोग्य विभागाने अलर्ट जारी केला आहे.राज्याचे आरोग्य तज्ज्ञ यांनी सांगितलं की सध्या ही प्रकरणे ठाणे, मुंबई आणि रायगड पुरतीच मर्यादित असून येत्या काही दिवसांत खबरदारी न घेतल्यास वाढू शकतात. 
 
लॉकडाऊन आणि निर्बंध शिथिल केल्यानंतर, देशातील सर्वात मोठ्या सणांपैकी एक दिवाळी साजरी करण्यासाठी भारतातील लोक उत्साहाने तयारी करत आहेत, परंतु तज्ञांनी दिवाळी, धनत्रयोदशी, वसुबारस आणि भाऊबीज पूर्वीच योग्य ती खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे.

दोन वर्षा नंतर कोरोनासाठीचे लावण्यात आलेले सर्व निर्बंध हटवल्यानंतर यंदाच्या वर्षी सर्व सण दणक्यात आणि उत्साहात साजरे केले जात आहे. लोकांमध्ये सण साजरे करण्याचा उत्साह ओसंडून वाहतांना दिसून येत आहे. देशात आता कोरोनाच्या नवीन व्हेरियंट ने शिरकाव केला असून कोरोनाचे हे नवीन व्हेरियंट ओमिक्रॉनचे सब-व्हेरियंट आहे. त्याचे नाव BA.5.1.7 आहे आणि हा विषाणू खूप वेगाने पसरतो. कोरोनाचा हा नवा व्हेरियंट वयस्कर आणि आजार असलेल्या लोकांसाठी अधिक धोकादायक असल्याचे सांगितलं आहे. सणासुदीचे दिवस, येणारा हिवाळा या मुळे कोरोनाचे प्रकरण वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. महाराष्ट्र आरोग्य विभाग आणि केंद्रीय आरोग्यमंत्री यांनी कोरोनासाठीची खबरदारी घेण्याचे सांगितले आहे. तसेच महाराष्ट्र आरोग्य विभागाने अलर्ट जारी केला  आहे. 
 
नवीन प्रकारामुळे नवीन लाटेची शक्यता वाढू शकते कारण यावेळी मोठ्या संख्येने लोक जमा होतील. कुठेही निर्बंध नाहीत आणि लोक मास्क घालत नाहीत. गर्दीच्या वेळी हा विषाणू पसरला तर तो फक्त 3-4 आठवड्यांत भारताच्या लोकसंख्येमध्ये पसरू शकतो.तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, शक्य तितक्या कमी लोकांना भेटण्याचा प्रयत्न करा. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा. वेळोवेळी आपले हात साबणाने आणि पाण्याने चांगले धुवा आणि अंतर ठेवा. सध्या लोक मास्क घालत नाहीत, त्यांनी मास्क घालायला सुरुवात करावी. त्यामुळे ते प्रदूषणही टाळू शकतात. कोणतेही लक्षण दिसल्यास ते सहज घेऊ नका. असे आवाहन करण्यात आले आहे.
 
Edited By- Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

कल्याण न्यायालयाने देशात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या 8 बांगलादेशींना तुरुंगवासाची शिक्षा सुनावली

LIVE: दारू दुकान उघडणे आता सोपे राहिलेले नाही उपमुख्यमंत्र्यांनी नवीन एनओसी नियम जारी केले

शाहरुख किंवा सलमान नाही, तर हा बॉलीवूड खान २०२५ मध्ये गुगलवर सर्वाधिक सर्च करण्यात आला सेलिब्रेटी

गोरेगाव पश्चिम मध्ये चाळीत एलपीजी सिलेंडरचा स्फोट; 3 जण जखमी

लाजिरवाणी कृत्य; पाकिस्तानच्या लष्करी प्रवक्त्याने महिला पत्रकाराला मारला डोळा, व्हिडिओ व्हायरल

पुढील लेख
Show comments