Dharma Sangrah

दिलासादायक : राज्यातील दैनंदिन कोरोना रुग्ण निदान कमी झाले

Webdunia
मंगळवार, 1 डिसेंबर 2020 (08:38 IST)
राज्यात कोरोनाची दुसरी लाट येईल या भीतीने आरोग्य विभागासह पालिका प्रशासनाने सर्व स्तरावर तयारी केली आहे. दुसरीकडे राज्यातील दैनंदिन रुग्ण निदान कमी झाल्याची दिलासादायक बाब समोर आली आहे. 
 
राज्यात सोमवारी ३ हजार ८३७ इतक्या रुग्णांचे निदान झाले असून  ८० मृत्यू झाले आहेत. मागच्या काही महिन्यांत दिवसभरात १०- १२ हजार रुग्ण आढळत होते.  सकारात्मक बाब म्हणजे राज्यात दैनंदिन रुग्णसंख्येचा आलेख नियंत्रणात असल्याचे दिसून आले आहे. यापूर्वी, २९ नोव्हेंबर रोजी ५ हजार ५४४, २८ नोव्हेंबरला ५ हजार ९६५ आणि २७ नोव्हेंबरला ६ हजार ४०६ इतके रुग्ण आढळले होते. 
 
राज्यात बाधितांची एकूण संख्या १८ लाख २३ हजार ८९६ झाली असून मृतांची संख्या ४७ हजार १५१ वर पोहोचली आहे. राज्यात ९० हजार ५५७ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सोमवारी ४ हजार १९६ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत १६ लाख ८५ हजार १२२ रुग्ण बरे झाले आहेत.  सध्या राज्यात ५ लाख ३५ हजार ५३० व्यक्ती घरगुती अलगीकऱणात असून ६ हजार ३५४ व्यक्ती संस्थात्मक अलगीकऱणात आहेत. आतापर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ८ लाख ५६ हजार ३८४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६.०८ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
 
मुंबई १९, नवी मुंबई ४, कल्याण डोंबिवली २, भिवंडी निजामपूर १, नाशिक ४, नाशिक मनपा ३, मालेगाव १, जळगाव ३, जळगाव मनपा ३, पुणे २, पुणे मनपा १, पिंपरी चिंचवड मनपा १, सोलापूर ५, सातारा १, रत्नागिरी २, जालना १, हिंगोली २, उस्मानाबाद १, बीड ३, बुलढाणा १, नागपूर ३, नागपूर मनपा ४, चंद्रपूर ७, चंद्रपूर मनपा ४ , गडचिरोली १ आणि अन्य राज्य व देशातील एक रुग्णांचा समावेश आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

हार्दिक पांड्या - माहिका रिलेशनशिप कन्फर्म

LIVE: आमदार थेट बिबट्याच्या वेशात अधिवेशनाला

पुण्यातील हडपसर येथे एका रुग्णाच्या मृत्यूनंतर संतप्त कुटुंबीयांनी रुग्णालयाच्या खिडक्या फोडल्या

मार्च 2026 मध्ये भारत पहिल्या राष्ट्रकुल खो खो स्पर्धेचे आयोजन करेल

सुरतच्या कापड बाजारात भीषण आग लागली, ज्यामुळे अनेक दुकाने जळून खाक

पुढील लेख
Show comments