Festival Posters

रविवारी 3007 नवे कोरोना रुग्ण दाखल

Webdunia
सोमवार, 8 जून 2020 (09:44 IST)
राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येतील वाढ सतत वाढत असून रविवारी 3007 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर दिवसभरात 91 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. एका दिवसांत 1924 रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात सध्या 43 हजार 511 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर एकूण कोरोनाबाधितांची संख्या 85 हजार 975 इतकी झाली आहे. 
 
राज्यात आतापर्यंत एकूण 39 हजार 314 कोरोनाग्रस्त बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. राज्यात आतापर्यंत 3060 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.देशातील सर्वाधिक कोरोनाबाधितांची संख्या एकट्या मुंबईत आहे. आज मुंबईत 1420 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. 
 
आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीतही कोरोनाचा वाढता संसर्ग चिंतेची बाब ठरत आहे. धारावीत 13 रुग्ण वाढले असून एकूण रुग्णसंख्या 1912वर पोहचली आहे. दादरमध्ये 24 नवे रुग्ण वाढले असून दादरमधील एकूण रुग्णसंख्या 408 झाली आहे. माहिममध्ये  13 नवे कोरोनाग्रस्त आढळले असून माहिममधील एकूण आकडा 637वर गेला आहे. मुंबईत एकूण 47 हजार 774 कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 21 हजार 190 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर 25 हजार 940 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर मुंबईत 1638 जण कोरोनामुळे दगावले आहेत.
 
ठाण्यात 13014, पालघर 1485, रायगड 1441, नाशिक 1521, जळगाव 1049, पुणे 9705, सोलापूर 1343, सातारा 630, सांगली 150, सिंधुदुर्ग 113, रत्नागिरी 354, औरंगाबादमध्ये 1965, नागपूरमध्ये 747 कोरोना रुग्ण आढळले आहेत.तर गडचिरोली 42, चंद्रपूर 32, गोंदिया 68, भंडारा 39, वर्धा 11, वाशिम 10, बीड 55, परभणी 78, बुलढाणा 87, यवतमाळमध्ये 160 कोरोनाबाधित सापडले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण सुधारलं असून रिकव्हरी रेट 45.72 टक्के इतका आहे. तर राज्यातील मृत्यू दर 3.55 टक्के आहे

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रातील गैर-कृषी विद्यापीठांमध्ये १४ मे पासून आंदोलन

सीबीएसई १२वीचा निकाल जाहीर, ८५.२०% विद्यार्थी उत्तीर्ण, मुलींनी पुन्हा बाजी मारली

इंडोनेशियन जोडीला पराभूत करून सात्विक-चिरागने थायलंड ओपनमध्ये विजयाने सुरुवात केली

सरकारने कर १५% वाढवला, एका दिवसात सोने ९,२०० रुपयांनी महाग झाले आणि चांदीच्या दरात १८,००० रुपयांची वाढ झाली

प्रीती झिंटाने सोशल मीडियावर जोरदार टीका केली; पंजाब किंग्सने सलग चार सामने गमावले

पुढील लेख