Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Fact Check : वाफेमुळे कोरोना नष्ट होतो हा दावा असत्य आहे

Webdunia
गुरूवार, 16 जुलै 2020 (18:21 IST)
सोशल मीडियात असा दावा केला जात आहे की गरम पाण्याची वाफ घेतल्याने कोरोना नष्ट होतो. यात असे ही म्हणण्यात आले आहे की, नाकाने किंवा तोंडाने गरम पाण्याची वाफ घेतल्यास कोरोना 100 टक्के नष्ट होतो आणि यात ही माहिती सर्वांना पाठवण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.
 
पडताळणी
हा दावा करण्यात आल्यानंतर या बाबत पडताळणी सुरू केली की खरंच गरम पाण्याची वाफ घेतल्यास कोरोना नष्ट होतो का? याबाबत काही कीवर्ड्सच्या आधारे शोध घेतला तेव्हा असे आढळून की कोरोनाच्या संक्रमणापासून वाचण्यासाठी लोक गरम पाण्याची वाफ घेत आहेत, मात्र अधिक वाफ घेणे हे शरीरासाठी घातक असल्याचे देखील सांगण्यात आले आहे. वाफ घेतल्याने श्वास घेण्यास समस्या येत नाही असे ही यात म्हटले आहे. पण यामुळे कोरोना 100 टक्के बरा होतो असा दावा कुठेही केलेला नाही आहे. 
 
तसेच सेंटर फॉर रेस्टॉरंट्स कंट्रोल अॅण्ड प्रिव्हेंशन या अमेरिकेतील संस्थेच्या वेबसाइटवर देखील हीच महीती मिळाली असून यात ही असेच सांगण्यात आले आहे की गरम पाण्याची वाफ घेतल्याने सर्दीच्या त्रासापासून सुटका होते. पण यात देखील कुठेही गरम पाण्याच्या वाफेमुळे कोरोना 100 टक्के बरा होत असल्याचा दावा करण्यात आलेला नाही.
 
याशिवाय पीआयबीने देखील गरम वाफेच्या दाव्यासंदर्भात ट्विट करून हा व्हायरल दावा सत्य नसल्याचे सांगण्यात आले आहे. ट्विटमध्ये सांगितल्याप्रमाणे गरम पाण्याच्या वाफेमुळे कोरोना नष्ट होतो या गोष्टीला कोणताही शास्त्रीय आधार आढळला नाही.


<

There is no scientific evidence to prove that inhaling hot water steam kills #Coronavirus.

Remember: Respiratory hygiene, social distancing and washing hands are effective measures to prevent #Covid19

Let’s spread facts, not fear and contribute to #IndiaFightsCoronavirus pic.twitter.com/fD6PYI68Ds

— PIB Fact Check (@PIBFactCheck) March 30, 2020 >तसेच WHOच्या वेबसाइटवर कुठेही गरम वाफ घेतल्यास कोरोना नष्ट होत असल्याचा उल्लेख नाही परंतु वेबसाइटवर कोरोना कसा रोखता येईल व त्यापासून कसा बचाव करता येईल यासाठी कोणती सावधगिरी बाळगावी याची माहिती मात्र दिली आहे.  
यावरून हेच स्पष्ट होते की, गरम पाण्याची वाफ घेतल्याने कोरोना 100 टक्के नष्ट होत नाही आणि तो नष्ट होत असल्याचा हा दावा असत्य आहे.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments