Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वडोदरामध्ये निरोप घेताना वधू बेशुद्ध झाली, पुन्हा उठूच शकली नाही,कोरोना पॉझिटिव्ह निघाली

Webdunia
गुरूवार, 4 मार्च 2021 (22:54 IST)
वधू सासरी जाताना वातावरण खूपच भावनिक असते, चेहऱ्यावर आनंद तर असतोच परंतु डोळ्यातून अश्रूंचा पाझर वाहत असतो, पण वडोदरामध्ये एका कुटुंबावर आयुष्यभर रडण्याची वेळ आली आहे. या कुटुंबात आयुष्यभर वधूचा असा विदाचा समारंभ विसरणार नाही. कारण या कुटुंबात वधू बेशुद्ध होऊन कोसळली तर परत उठलीच नाही.
 
ही बाब शहरातील गोत्री परिसरातील आहे जिथे आनंद शोकात कधी बदलला हे कळलेच नाही. घरातून सासरी जाणाऱ्या एका नववधूला आयुष्यातून निरोप घ्यावा लागला. घरातून सासरी जाताना निरोप देण्याची वेळ होती प्रत्येकजण आनंदाने मुलीला सासरी जाताना निरोप देत असताना वधू कोसळून खाली पडून बेशुद्ध झाली. 
तातडीने तिला रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. मृत्यू नंतर तिचा शव विच्छेदनाच्या अहवालात तिला कोरोना असल्याचे समजले. तिचा कोरोना चाचणीचा अहवाल सकारात्मक आला.
 लग्नाच्या वेळीच मुक्ताला ताप होता: शहरातील गोत्री भागात राहणारी मुक्ता सोलंकी आणि  कृष्ण टाऊनशिप मधील हिमांशू शुक्लाचे एक मेकांवर प्रेम होते. या लग्नाची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे की हे लग्न दोघांच्या कुटुंबाला मान्य होते. या दोघांचे लग्न 1 मार्च रोजी झाले होते. गुरुवारी मुलीचा निरोप समारंभ होता. या विदाईच्या समारंभात अपघात झाला. 
मिळालेल्या माहितीनुसार लग्नाच्या वेळी मुक्ताला ताप होता. डॉक्टरांनी तिला तापाचे औषध दिले होते आणि मुक्ताला विश्रांती घेण्यास सांगितले होते. मुक्ताच्या तापामुळे तिचा विदाईचा कार्यक्रम 2 दिवस पुढे ढकलण्यात आला होता. वधूच्या जोड्यात बसलेली मुक्ताला भोवरी आली आणि ती जागेवरच कोसळून बेशुद्ध झाली.
 

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments