Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात ‘कोरोना’चा धोका वाढला, 14317 नवीन रुग्ण, 57 जणांचा मृत्यू

Webdunia
शुक्रवार, 12 मार्च 2021 (09:39 IST)
राज्यात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढ होत असल्याने केंद्र सरकारने देखील चिंता व्यक्त केली आहे. देशात आढळून येणाऱ्या एकूण रुग्णांपैकी 60 टक्के रुग्ण महाराष्ट्रात आढळून येत आहेत. राज्यात दिवसेंदिवस रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याने प्रशासनाची चिंता अधिक वाढली आहे. राज्यात गेल्या 24 तासात तब्बल 14 हजार 317 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.
 
राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 22 लाख 66 हजार 374 इतकी झाली असून रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 13.17 टक्के इतके झाले आहे. राज्यात रुग्ण वाढत असताना राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. सध्या राज्यात 1 लाख 6 हजार 070 ॲक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रुग्ण वाढत असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण काही प्रमाणात वाढत असल्याने प्रशासनाला दिलासा मिळात आहे. गेल्या 24 तासात राज्यात 7 हजार 193 रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत 21 लाख 6 हजार 400 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण घटले आहे. सध्या रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 92.94 टक्के इतके आहे.
 
राज्यात गेल्या 24 तासात 57 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या 52 हजार 667 एवढी झाली आहे. राज्यात मृत्यू होण्याचे प्रमाण 2.32 टक्के इतके आहे. आतापर्यंत घेण्यात आलेल्या 1 कोटी 72 लाख 13 हजार 312 प्रयोगशाळा तपासण्यामध्ये 22 लाख 66 हजार 374 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सध्या 4 लाख 80 हजार 083 रुग्ण होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 4 हजार 719 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

संबंधित माहिती

चंद्रपुरात 1500 रुपये चोरी करण्याचा आरोपावरून एका व्यक्तीची हत्या, आरोपीला अटक

बारामतीत EVM स्ट्राँग रुमचा सीसीटीव्ही कॅमेरा 45 मिनिटे बंद असल्याचा शरद पवार गटाचा आरोप

मतदाराला आमदाराने कानशिलात लगावली, व्हिडीओ व्हायरल!

GT vs KKR Playing 11: गुजरातला प्लेऑफ मध्ये जाण्यासाठी केकेआरला पराभूत करण्याचे प्रयत्न, प्लेइंग 11 जाणून घ्या

गडचिरोलीत नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक, तीन नक्षलवादी ठार, दोन महिलांचाही समावेश

बुरख्याच्या वादावर माधवी लता बोलल्या कोणाला घाबरत नाही

पाकिस्तानकडे बांगड्याही नाहीत... पंतप्रधान मोदींनी भारत आघाडीवर निशाणा साधला

मुंबईत 29 लाखांना विकले रीवा येथून चोरीला गेलेले सहा महिन्यांचे बाळ

Instant Noodles Side Effects इंस्टंट नूडल्स खाल्ल्याने 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, संपूर्ण कुटुंब आजारी

पत्नीने वेळेवर जेवण न दिल्याने संतप्त पतीने कुऱ्हाडीने वार करून हत्या केली

पुढील लेख
Show comments