Marathi Biodata Maker

राज्यात मार्च महिन्यात तिसऱ्यांदा एकाही कोरोना मृत्यूची नोंद नाही

Webdunia
गुरूवार, 10 मार्च 2022 (12:58 IST)
राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहे.  राज्यात बुधवारी 359 नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात मार्च महिन्यात तिसऱ्यांदा एकाही मृत्यूची नोंद झालेली नाहीये. यापूर्वी 7 मार्च आणि 2 मार्चला एकाही मृत्यूची नोंद झालेली नव्हती. राज्यातील आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या 78 लाख 69 हजार 857वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत 1 लाख 43 हजार 745 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात 3 हजार 9 कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत.
 
राज्यातील ५५९ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत एकूण 77 लाख 19 हजार 100 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.08% एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.82% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 7 कोटी 84 लाख 19 हजार 100 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 78 लाख 69 हजार 857 (10.04 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 27 हजार 116 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 604 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

Update in Nashik TCS case टीसीएस आरोपी निदा खानला न्यायालयाने १४ दिवसांच्या नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात पाठवले

LIVE: महाराष्ट्र तीव्र उष्णता आणि जीवघेण्या उष्णतेच्या लाटेच्या विळख्यात

महाराष्ट्रात भीषण उष्णतेची लाट; विदर्भात ६ जणांचा मृत्यू; प्रशासनाने नागरिकांना दुपारी १२ ते ४ या वेळेत घरातच राहण्याचा सल्ला दिला

सोमनाथ अमृत महोत्सवात पोहोचले PM मोदी

वाहन खोल दरीत कोसळून 6 जणांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments