Dharma Sangrah

मजुरांना घरी जायचे आहे, विशेष रेल्वेची सुविधा करा - मुख्यमंत्री

Webdunia
बुधवार, 22 एप्रिल 2020 (08:46 IST)
सहा लाख स्थलांतरित कामगार आणि मजुरांच्या जेवणाची व्यवस्था आणि इतर व्यवस्था केली आहे. त्यांची जबाबदारी महाराष्ट्र सरकारने घेतली आहे. तरीही हे लोक घरी जाऊ इच्छितात. काही वेळा ते आंदोलनाच्या पावित्र्यात येतात. ३० एप्रिल नंतर १५ मे पर्यंत विषाणुचा प्रादुर्भाव वाढण्याचा अंदाज केंद्र सरकार व्यक्त करत असेल तर  आता हातात असलेला कालावधी लक्षात घेऊन परराज्यातील अडकलेल्या या कामगार आणि मजुरांना त्यांच्या मुळगावी पाठविण्यासाठी स्पेशल ट्रेनची व्यवस्था करावी अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा केंद्राकडे केली आहे.
 
मजुरांचा विचार  केंद्र शासनाने करावा, एप्रिल अखेरपर्यंत यासंदर्भातील गाईडलाईन निश्चित करावी,  अशी मागणी आपण प्रधानमंत्री तसेच रेल्वेमंत्रालयाकडे केली  असल्याचा पुनरुच्चार  मुख्यमंत्र्यांनी केला.अतिरिक्त केंद्रीय सचिव मनोज जोशी यांच्या अध्यक्षतेखाली पाच जणांचे केंद्रीय पथक महाराष्ट्रात आले आहे आज मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरंसिगच्या माध्यमातून त्यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. या संवादात आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्यसचिव अजोय मेहता, केद्रीय पथकाचे सदस्य,बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त प्रविण परदेशी आणि मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

घरात धार्मिक कार्य करतांना कोणती काळजी घ्यावी?

तुमच्या मोबाईल क्रमांकाचा शेवटचा अंक तुमच्यासाठी शुभ आहे का?

Sanskrit Baby Girl Names चैत्र गौरी निमित्त खास! मुलींसाठी गौरी पासून प्रेरित २० नावे अर्थासहित

Delayed Periods २ महिन्यांपासून मासिक पाळी आली नाही? घाबरू नका, स्वयंपाकघरातील हे ५ पदार्थ करतील कमाल

सर्व पहा

नवीन

पॅरासिटामॉलसह ९० औषधांचे नमुने अनधिकृत आढळले; कारवाई करण्याचे डीसीजीआयचे राज्य सरकारांना निर्देश

राज्यातील आपत्कालीन आरोग्य सेवा अधिक मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र सरकार १७३७ नवीन रुग्णवाहिका सुरू करणार

LIVE: विधान परिषदेतून ९ सदस्य निवृत्त होणार

नगरसेवकाचा मुलगा तीन वर्षांपासून अल्पवयीन मुलींचे शोषण करत होता, दक्षिण गोवा पोलिसांनी ठोकल्या बेड्या

मुंबईतील सर्व फेरीवाल्यांची पडताळणी होणार; बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई, मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश

पुढील लेख
Show comments