Festival Posters

चिंताजनक, फक्त 5 दिवसात सुमारे 50 हजार नवीन रुग्ण

Webdunia
सोमवार, 8 जून 2020 (16:16 IST)
देशात प्रत्येक नवीन दिवसासह कोरोनाचे आकडे वाढत आहेत. गेल्या 24 तासात कोरोनाची 9983 नवे रुग्ण आढळले आहेत. एकूण रुग्णांची संख्या अडीच लाखाच्या वर गेली आहे. चिंतेची बाब म्हणजे फक्त 5 दिवसात जवळपास 50 हजार नवीन रुग्ण वाढले आहेत.- 3 जून रोजी देशात एकूण रुग्णांची संख्या 2 लाख 7 हजार 615 होती. 
- 4 जून रोजी कोरोना रुग्णांची संख्या 2.16 लाखांवर गेली. 
- 5 जून रोजी रूग्णांची संख्या वाढून 2.26 लाख झाली
- 6 जून रोजी रुग्ण संख्या 2.36 लाखांवर पोहोचली
- 7 जून रोजी रुग्ण सख्या 2.46 लाख झाली. 
- 8 जून रोजी देशातील एकूण रुग्णांची संख्या 2 लाख 56 हजार 611 झाली आहे आहे. 
 
म्हणजेच दररोज सुमारे 10 हजार नवीन रुग्ण देशात वाढत आहे.देशात कोरोनाचा पहिला रुग्ण 30 जानेवारी रोजी सापडला होता. 7 मे रोजी कोरोना रूग्णांची संख्या 50 हजारांवर गेली होती. म्हणजेच, सुमारे 96 दिवसांत प्रथम 50 हजार रुग्ण आढळले. १ मे रोजी रुग्णांची संख्या १ लाखांवर गेली होती. 27 मे रोजी रुग्णांची संख्या 1.50 लाखांवर पोहोचली आणि 3 मे रोजी ती 2 लाखांच्या वर गेली.आता देशातील एकूण रुग्णांची संख्या 2 लाख 56 हजार 611 आहे. आतापर्यंत 7 हजार 135 लोकांचा बळी गेला असून 1 लाख 24 हजार 95 रुग्ण बरे झाले आहेत. देशात आता 1 लाख 25 हजार 381 रुग्ण उपचार घेत आहेत. कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. येथे एकूण रुग्णांची संख्या 89 हजार 975 वर गेली असून आतापर्यत 3060 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Rangpanchami 2026 Wishes In Marathi रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

इराण-इस्रायल युद्ध: भविष्य मालिका यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरण्याची वेळ आली का?

Women's Day 2026 Speech in Marathi महिला दिन भाषण मराठी

कोपर आणि काळ्या गुडघ्यासाठी घरगुती उपाय

शरीरासाठी एकाच वेळी किती अन्न खावे? अति खाण्याचे 'हे' गंभीर दुष्परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२६-२७: काय स्वस्त आणि काय महाग? मुख्यमंत्री फडणवीस यांनी मोठ्या घोषणा केल्या, संपूर्ण यादी पहा

१० लाख घरे आणि ६,००० किमी एक्सप्रेसवेच्या प्रमुख घोषणांसह वाधवान 'चौथी मुंबई' बनणार

LIVE: महाराष्ट्र अर्थसंकल्पात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर

मुख्यमंत्री फडणवीस यांनी अर्थसंकल्प अजितदादांना समर्पित केला आणि माजी उपमुख्यमंत्र्यांच्या नावाने नागरी पुरस्कार आणि स्मारकाची घोषणा केली

अर्जुन आणि सानिया विवाहबंधनात अडकले

पुढील लेख
Show comments