Marathi Biodata Maker

चिंताजनक, फक्त 5 दिवसात सुमारे 50 हजार नवीन रुग्ण

Webdunia
सोमवार, 8 जून 2020 (16:16 IST)
देशात प्रत्येक नवीन दिवसासह कोरोनाचे आकडे वाढत आहेत. गेल्या 24 तासात कोरोनाची 9983 नवे रुग्ण आढळले आहेत. एकूण रुग्णांची संख्या अडीच लाखाच्या वर गेली आहे. चिंतेची बाब म्हणजे फक्त 5 दिवसात जवळपास 50 हजार नवीन रुग्ण वाढले आहेत.- 3 जून रोजी देशात एकूण रुग्णांची संख्या 2 लाख 7 हजार 615 होती. 
- 4 जून रोजी कोरोना रुग्णांची संख्या 2.16 लाखांवर गेली. 
- 5 जून रोजी रूग्णांची संख्या वाढून 2.26 लाख झाली
- 6 जून रोजी रुग्ण संख्या 2.36 लाखांवर पोहोचली
- 7 जून रोजी रुग्ण सख्या 2.46 लाख झाली. 
- 8 जून रोजी देशातील एकूण रुग्णांची संख्या 2 लाख 56 हजार 611 झाली आहे आहे. 
 
म्हणजेच दररोज सुमारे 10 हजार नवीन रुग्ण देशात वाढत आहे.देशात कोरोनाचा पहिला रुग्ण 30 जानेवारी रोजी सापडला होता. 7 मे रोजी कोरोना रूग्णांची संख्या 50 हजारांवर गेली होती. म्हणजेच, सुमारे 96 दिवसांत प्रथम 50 हजार रुग्ण आढळले. १ मे रोजी रुग्णांची संख्या १ लाखांवर गेली होती. 27 मे रोजी रुग्णांची संख्या 1.50 लाखांवर पोहोचली आणि 3 मे रोजी ती 2 लाखांच्या वर गेली.आता देशातील एकूण रुग्णांची संख्या 2 लाख 56 हजार 611 आहे. आतापर्यंत 7 हजार 135 लोकांचा बळी गेला असून 1 लाख 24 हजार 95 रुग्ण बरे झाले आहेत. देशात आता 1 लाख 25 हजार 381 रुग्ण उपचार घेत आहेत. कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. येथे एकूण रुग्णांची संख्या 89 हजार 975 वर गेली असून आतापर्यत 3060 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

LIVE: मनोज जरांगे यांचा राज्य सरकारला ३० मे पासून उपोषण करण्याचा अल्टिमेटम

CBSE बोर्डचा नवा नियम : आता इयत्ता ९वी-१०वी मध्ये तीन भाषा शिकणे अनिवार्य असणार, नियम १ जुलैपासून लागू

भाविकांनी भरलेल्या ट्रॉलीला ट्रकची धडक, सहा जणांचा मृत्यू

नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी शुभम खैरनारने डॉक्टर असल्याचे भासवून कौन्सलिंगच्या नावावर विद्यार्थ्यांची लाखो रुपयांची फसवणूक केली

नीट यूजी परीक्षा वाद छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांचे आंदोलन, केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

पुढील लेख
Show comments