Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ODI World Cup: 'मी संघासोबतच राहणार...', विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर हार्दिक पंड्या म्हणाला

Webdunia
शनिवार, 4 नोव्हेंबर 2023 (15:02 IST)
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी भारताला मोठा धक्का बसला आहे. स्टार अष्टपैलू हार्दिक पंड्या उर्वरित स्पर्धेतून बाहेर पडला. त्याच्या घोट्याला दुखापत झाली होती. मात्र, आऊट झाल्यानंतर त्यांचे हे वक्तव्य समोर आले आहे. त्याने इंस्टाग्रामवर पोस्ट करत वर्ल्ड कपमधून बाहेर पडल्याबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. संघासोबत राहून जल्लोष करत राहीन, असे हार्दिकने म्हटले आहे. भारताला सध्या साखळी फेरीत आणखी दोन सामने खेळायचे आहेत. भारतीय संघानेही उपांत्य फेरी गाठली आहे.
 
हार्दिकने लिहिले- विश्वचषकाच्या उर्वरित भागात मी खेळू शकणार नाही हे सत्य पचवणे कठीण आहे. मी संघासोबत उत्कटतेने असेन आणि प्रत्येक सामन्यातील प्रत्येक चेंडूवर त्यांचा जयजयकार करेन. सर्व शुभेच्छा, प्रेम आणि समर्थनासाठी धन्यवाद. हे अविश्वसनीय आहे. हा संघ खास आहे आणि मला खात्री आहे की आम्ही सर्वांना अभिमान वाटू शकतो. तुम्हा सगळ्यांवर प्रेम करतो.
 
बांगलादेशविरुद्धच्या सामन्यादरम्यान हार्दिकने लिटन दासचा शॉट उजव्या पायाने रोखण्याचा प्रयत्न केला होता. यादरम्यान त्याचा तोल गेला आणि चुकीने तो डाव्या पायावर पडला. यानंतर,  उठताना, त्याला वेदना होत होता.  त्याला नीट चालता येत नव्हते. काही वेळातच फिजिओला मैदानावर बोलावण्यात आले. यावेळी त्याच्यासोबत विराट कोहली आणि कर्णधार रोहित शर्मा हे दोन वरिष्ठ खेळाडू होते. फिजिओ आल्यानंतर सुमारे पाच मिनिटे सामना थांबला.
 
फिजिओने हार्दिकच्या डाव्या पायावर पट्टी लावली आणि पेन किलर स्प्रेही लावला, पण आराम मिळाला नाही. हार्दिकने उठून पुन्हा गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला, पण तो करू शकला नाही. अशा परिस्थितीत कोणताही विलंब न करता आणि कोणतीही जोखीम न घेता रोहितने हार्दिकला फिजिओसोबत मैदानाबाहेर पाठवले. तोपर्यंत हार्दिकने पहिल्या षटकातील तीन चेंडू टाकले होते. उर्वरित तीन चेंडू विराट कोहलीने टाकले. त्याने सहा वर्षांनंतर वनडेत गोलंदाजी केली. 
त्याने चार सामन्यांत पाच विकेट्स घेतल्या आहेत. या काळात त्याचा इकॉनॉमी रेट 6.84 राहिला आहे. 34 धावांत 2 बळी ही सर्वोत्तम कामगिरी होती. त्याचबरोबर त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्ध फक्त एकदाच फलंदाजीची संधी मिळाली. त्या सामन्यात तो 11धावा करून नाबाद राहिला. 
 
गेल्या महिन्यात पुण्यात बांगलादेश विरुद्ध भारताच्या विश्वचषक सामन्यात गोलंदाजी करताना हार्दिकला डाव्या घोट्याला दुखापत झाली होती आणि आता हे पुष्टी झाली आहे की 30 वर्षीय खेळाडू वेळेत बरा होऊ शकला नाही. हार्दिकच्या जागी प्रसिद्ध  कृष्णाचा संघात समावेश करण्यात आला आहे. प्रसिधला विश्वचषकाचा अनुभव नाही आणि प्रथमच विश्वचषक संघात त्याचा समावेश करण्यात आला आहे. प्रसिद्धला बॅकअप म्हणून तयार राहण्यास सांगण्यात आले आणि तो एनसीए बंगलोर येथे होता. शनिवारी स्पर्धेच्या इव्हेंट टेक्निकल कमिटीकडून मान्यता मिळाल्यानंतर त्याचा भारतीय संघात समावेश करण्यात आला.
 





Edited by - Priya Dixit  
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

टी20 विश्व कप विजेता भारतीय टीमचा होईल रोड शो, वानखेडे स्टेडियममध्ये होणार सत्कार

फ्रीज उघडताच लागला विजेचा झटका, आई आणि मुलीचा मृत्यू

Monsoon Update: मुसळधार पावसाचा इशारा, येत्या 24 तासांत या राज्यांमध्ये कोसळणार पाऊस

‘लष्कराकडून 1 कोटींची मदत मिळाली नाही,’ स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या अग्निवीराचे कुटुंबीय म्हणतात...

विधानसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे होतील महाराष्ट्रचे मुख्यमंत्री, सीट शेयरिंग पूर्वीच नेत्याने दिला जबाब

सर्व पहा

नवीन

भारत-पाकिस्तान सामना लाहोरमध्ये या दिवशी होऊ शकतो

हार्दिक पंड्या जगातील नंबर वन T20 अष्टपैलू खेळाडू बनला

विश्वविजेता भारतीय संघ बार्बाडोसहून भारताकडे रवाना

IND vs ZIM: टीम इंडिया झिम्बाब्वे दौऱ्यावर रवाना, अभिषेक-जुरेल आणि रितू नव्या स्टाईलमध्ये

IND vs ZIM: बीसीसीआयने झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यांसाठी तीन मोठे बदल केले

पुढील लेख
Show comments