suvichar

जेव्हा यमराजाला आली यमुनाची आठवण

Webdunia
भाऊबीज कथा
 
सूर्याची पत्नी संज्ञा यांना दोन मुलं होती. पुत्राचे नाव यमराज तर पुत्रीचे नाव यमुना असे होते. संज्ञा आपल्या पती सूर्याची किरण सहन करुन शकत नसल्यामुळे उत्तरी ध्रुवात सावली बनून राहू लागली. उत्तरी ध्रुवात वस्ती केल्यानंतर संज्ञाचे यमराज आणि यमुना यांच्यासोबत व्यवहारात अंतर येऊ लागले. यामुळे व्यथित होऊन यमाने आपली यमपुरीत आपले वास्तव्य केले. यमपुरीत आपला भाऊ पापी लोकांना यातना देतो हे यमुनाला बघवत नसल्यामुळे ती गोलोक चालली गेली.
 
नंतर एकेदिवशी यमाला यमुनाची आठवण आली आणि तो बहिणीला भेटायला गेला. त्यादिवशी त्याने नरकात पिचत पडलेल्या जिवांना त्या दिवसापुरते मोकळे केले. भावाला बघून बहिण खूप खूश झाली. तिने त्याचे आदरपूर्वक स्वागत केले, त्याला स्वादिष्ट जेवण खाऊ घातले. भावाने खूश होऊन वरदान मागायला सांगितले तेव्हा तिने म्हटले की प्रतिवर्ष या दिवशी बहिण आपल्या भावाला जेवू घालून त्याला ओवळेल त्या भावाला यमाची भीति राहणार नाही. यावर यमराज तथास्तू म्हणून यमलोकाकडे निघून गेले. 

तेव्हापासून कार्तिक शुक्ल द्वितीयला आपल्या भावाचा सत्कार करुन त्यांना ओवाळून बहिण भावासाठी जी प्रार्थना करते ती भावाला लाभते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Adi Shankaracharya Jayanti 2026 आदि शंकराचार्य जयंती २०२६ तिथी, महत्त्व आणि अनमोल विचार

Adi Shankaracharya Jayanti 2026 Wishes in Marathi आदि शंकराचार्य जयंती शुभेच्छा

आरती मंगळवारची

गंगा सप्तमी 2026: तारीख, शुभ मुहूर्त आणि महत्त्व जाणून घ्या

Parshuram Jayanti 2026 Wishes in Marathi परशुराम जयंतीच्या शुभेच्छा

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

पुढील लेख
Show comments