Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Devuthani Ekadashi 2022 प्रबोधिनी एकादशीला या गोष्टी करणे टाळा

Webdunia
शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2022 (07:37 IST)
सनातन धर्मात एकादशीच्या व्रताचे खूप महत्त्व आहे. यामध्ये देवोत्थान आणि देव प्रबोधिनी एकादशी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या देव उठनी एकादशीला विशेष महत्त्व आहे. दरवर्षी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला हा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी भगवान श्रीहरी चातुर्मासाच्या दीर्घ झोपेनंतर जागे होतात. त्यामुळे या दिवशी भगवान विष्णूची पूर्ण विधीपूर्वक पूजा केली जाते. या दिवसापासून 4 महिन्यांच्या प्रदीर्घ अंतरानंतर शुभ मंगळ कार्येही सुरू होतात. या दिवशी व्रत केल्यास बैकुंठधामची प्राप्ती होते. हे व्रत न पाळणाऱ्यांनीही या दिवशी काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
 
दीपदान
या दिवशी नदी तीर्थ क्षेत्रातील घाटावर जाऊन दीपदान करतात. ही दिवाळी देवता साजरी करतात असे मानले गेले आहे. देव दिवाळीला सर्व देवतागण गंगा नदीच्या घाटावर येऊन दीप प्रजवल्लित करुन आनंद उत्सव साजरा करतात. म्हणूनच या दिवशी गंगा स्नान करुन दीपदान करण्याचं महत्व आहे. या दिवशी दीपदान केल्याने दीर्घायुष्य प्राप्त होतं.
 
तुलशी पूजन 
या दिवशी तुळशी आणि शालिग्राम यांची पूजा केली जाते. अनेक राज्यांमध्ये या दिवशी तुळशी विवाह आयोजन केलं जातं. या दिवशी तुळस तोडू नये. या दिवशी तुळशीच्या झाडाखाली दिवा लावावा. द्वादशी तिथीला तुळशीच्या पानांनी पारणं करावं. व्रत करणार्‍यांनी तुळस तोडू नये. आवश्यक असल्यास मुलांकडून किंवा वयस्कर ज्यांनी व्रत ठेवला नसेल त्यांच्याकडून तुळस तोडवावी.
 
अशा लोकांना नरकात स्थान मिळतं
एकादशी विष्णूंना प्रिय तिथी आहे. पुराणांप्रमाणे या दिवशी व्रत करत नसणार्‍यांनी देखील कांदा-लसूण, मांस, अंडी किंवा तामसिक पदार्थांचे सेवन करु नये. या दिवशी भात खाऊ नये. शारीरिक संबंध ठेवू नये. 
 
तांदळाचे सेवन करु नये
शास्त्रांप्रमाणे एकादशी तिथीला तांदूळ किंवा तांदळाने तयार पदार्थ खाऊ नये. या दिवशी तांदूळ खाल्लयाने सरपटणारे प्राणी अशा योनित जन्म मिळतो असे मानले गेले आहे. 
 
हे केल्याने लक्ष्मी रुसून बसेल
या दिवशी मोठ्यांचा अपमान करु नये. घरात शांति राखावी. वातावरण शुद्ध आणि आनंदी नसेल तर लक्ष्मी प्रसन्न होत नसते.
 
सत्यनारायण कथा
या दिवशी सत्यनारायण देवाची कथा श्रवण करावी.
 
हे करणे टाळा
या दिवशी दिवसाला झोपणे टाळावे. आजारी किंवा शारीरिक रुपाने कमजोर असल्यास या दिवशी आराम करताना उशाशी तुळशीचं पान ठेवां. या दिवशी मदिराचे सेवन करु नये. क्रोध, खोटे बोलणे, इतरांना चिडवणे टाळा. 

संबंधित माहिती

श्री आनंदनाथ महाराज कृत श्रीगुरुस्तवन स्तोत्र

पती-पत्नीच्या वयात किती फरक असावा?

आरती मंगळवारची

श्री स्वामी समर्थ आरती Swami Samarth 3 Aartis

श्री स्वामी समर्थ काकड आरती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

पुढील लेख
Show comments