Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कहाणी ऐकल्याशिवाय हरतालिका व्रत अपूर्ण, जाणून घ्या नियम

Webdunia
गुरूवार, 20 ऑगस्ट 2020 (18:50 IST)
भाद्रपद तृतीयेला हरितालिकेचे पूजन करण्याची प्राचीन परंपरा असून या दिवशी कुमारिका आणि महिला व्रत करतात. हरितालिका व्रत केल्याने सौभाग्य येतं आणि कुमारिकांना मनोइच्छित वर प्राप्ती होते म्हणून मनोभावे हे व्रत केलं जातं. कुमारिका चांगला पती मिळावा तसेच विवाहित स्त्रिया पतीला दीर्घायुष्य लाभावे, संसार सुखाचा व्हावा, यासाठी हे व्रत करतात. परंतू याचे काही कडक नियम देखील आहेत तर हे व्रत करताना हे नियम जाणून घेणे देखील आवश्यक आहे.
 
मान्यता आहे की एकदा हे व्रत करण्यास सुरुवात केल्यास आजीवन हे व्रत करावे. 
 
या दिवशी संपूर्ण दिवसभर कडक उपास केला जातो. अन्न-पाणी ग्रहण केले जात नाही.
 
कहाणी हरतालिकेची
 
या उपवासात रात्रभर जागरण करुन वाळूने तयार शिवलिंगाची प्रहराप्रमाणे पूजा करायची असते आणि रात्रभर जागून भजन-कीर्तन करावे.
 
व्रत दरम्यान हरतालिका व्रत कथा वाचणे किंवा ऐकणे अनिवार्य असल्याचे सांगितले गेले आहे. याशिवाय व्रत अपूर्ण मानले गेले आहे.
 
 
यादिवशी चुकूनही कोणाचा अपमान करणे आणि अपशब्द बोलणे टाळावे. मोठ्यांचा आदर करुन त्यांचा आशिर्वाद घेऊन पूजा करण्याचा नियम आहे.

संबंधित माहिती

मंगलाष्टक मराठी संपूर्ण Marathi Mangalashtak

शुक्रवारी कोणत्या मंत्राचा जप करावा?

अक्षय्य तृतीयेला तयार होत आहेत सुकर्म योगासह हे 5 शुभ संयोग, या राशीचे जातक ठरतील भाग्यवान

श्री महालक्ष्मी कोल्हापूर

शुक्रवारची आरती.... जयदेव जयदेव जय विघ्नाधीशा ॥

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

पुढील लेख
Show comments