Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हनुमान जयंती: पानांचा हा उपाय, अडचणींवर करेल मात

Webdunia
हनुमान जयंतीला पिंपळाच्या 11 पानांचा उपाय अमलात आणावा. ब्रह्म मुहूर्तात उठावे. नंतर स्नान इत्यादी करून एखाद्या पिंपळाच्या झाडाचे 11 पानं तोडावे. पान खंडित नसावे. या 11 पानांवर स्वच्‍छ पाण्यात कुंकू, अष्टगंध किंवा चंदन मिसळून श्रीराम असे लिहावे. नाव लिहिताना हनुमान चालीसा पाठ करावा. सर्व पानांवर 'श्रीराम' नाव लिहून या पानांची एक माळ तयार करावी. ही माळ कोणत्या ही हनुमान मंदिरात जाऊन बजरंग बलीला अर्पित करावी.
 
बनारसी पान अर्पित करावे
हनुमान जयंतीला हनुमानाला तयार बनारसी पान अर्पित करावा. याने हनुमानाची कृपा प्राप्त होते.
 
रामायण किंवा श्रीरामचरित मानसचा पाठ करणार्‍यांना भक्तांना हनुमानाचे विशेष स्नेह प्राप्त होतं. हनुमान जयंतीला संध्याकाळी हनुमानाला केवडा अत्तर आणि गुलाबाची माळ अर्पित करावी. याने हनुमान प्रसन्न होतात.
 
तसेच हनुमानाला विशेष पान अर्पित केल्याने जीवनातील सर्व समस्या नाहीश्या होतात.
 
कसे तयार कराल हनुमानाचा विशेष पान
या पानात केवळ कत्था, गुलकंद, बडीशेप, खोबरा बुरा आणि सुमन कतरी घालावी. हे पान ताजे, गोड आणि रसभरीत असावे. यात चुना, तंबाखू आणि सुपारी टाकू नये हे लक्षात घ्यावे.
 
कसे करावे हनुमानाला पान अर्पण 
विधी-विधानाने पूजन केल्यानंतर म्हणावे 'हे हनुमान. हे गोड पान अर्पित करत आहे. माझ्या जीवनात देखील असाच गोडवा असू दे. अशी प्रार्थना करत पान अर्पण केल्याने प्रत्येक समस्या दूर होईल.

संबंधित माहिती

Lord Hanuman 10 अचूक उपाय, ज्याने बजरंगबली प्रसन्न होतात, पैशाची कमतरता दूर होते, रोग आणि दुःख नष्ट होतात

Maruti Aarti मारुतीच्या आरत्या संपूर्ण मराठी

Akshaya Tritiya Upay हे 3 चमत्कारिक उपाय देवी लक्ष्मीला प्रसन्न करतील

आरती मंगळवारची

Akshaya Tritiya 2024 Daan अक्षय्य तृतीयेच्या दिवशी या 5 गोष्टींचे दान आयुष्यातील सर्व समस्या दूर करतील

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

पुढील लेख
Show comments