Marathi Biodata Maker

जेव्हा कृष्ण पुत्र पडला दुर्योधन पुत्रीच्या प्रेमात

Webdunia
महाभारतातील अनेक प्रसंग प्रचलित नाही त्यामुळे काही प्रसंग जाणून घेतल्यावर आपल्याला आश्चर्य वाटू शकतं. अश्याच एका नात्यामुळे कृष्ण आणि दुर्योधन यांच्या कुटुंबाची खळबळ उडाली होती आणि शेवटी भयानक युद्ध झालं.
 
प्रभू कृष्ण यांच्या 8 बायकांमधून एक होती जाम्बवती. जाम्बवती-कृष्ण यांच्या पुत्राचे नाव सांब होते. आणि या पुत्रामुळेच कृष्ण वंशाचा नाश झाला होता. महाभारत कथेनुसार सांब दुर्योधन आणि भानुमती यांच्या पुत्री लक्ष्मणाच्या प्रेमात पडला होता. ते दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. दुर्योधन आपल्या मुलीचे विवाह कृष्ण पुत्रासोबत करू इच्छित नसल्यामुळे एके दिवशी सांब आणि लक्ष्मणा दोघांनी प्रेम विवाह केले आणि रथात बसून द्वारकेकडे जाऊ लागले. ही गोष्ट कौरवांच्या कानात पडल्याक्षणी कौरवी पूर्ण सेना घेऊन सांबशी युद्ध करायला पोहचले.
 
कौरवांनी सांबला बंदी घातले. ही गोष्ट जेव्हा कृष्ण आणि बलराम यांना कळली तेव्हा बलराम हस्तिनापूर पोहचले आणि सांबच्या मुक्तीसाठी विनम्रपूर्वक याचना केली परंतू कौरवांनी ती स्वीकारली नाही. अशात बलराम क्रोधित झाले आणि आपल्या नांगराने हस्तिापुराची संपूर्ण धरा खेचून गंगेत बुडवण्याला निघाले. हे बघून कौरव घाबरले. सर्वांनी बलरामाची माफी मागितली आणि सांबला लक्ष्मणासोबत निरोप दिला. नंतर द्वारकेत सांब आणि लक्ष्मणा यांचे वैदिक रित्या विवाह संपन्न झाले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Shattila Ekadashi 2026 षटतिला एकादशी व्रत कधी पाळले जाईल?

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

Paush Purnima 2026 पौष पौर्णिमा कधी ? हा शुभ दिवस स्नान आणि दानधर्मात घालवा, पूजा पद्धत आणि शुभ वेळ जाणून घ्या

10 Names of Shani प्रत्येक शनिवारी 10 नावांचा जप करा, शनिदेव प्रसन्न होतील

शनिवारची आरती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।

पुढील लेख
Show comments