Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Gayatri Mantra : अत्यंत चमत्कारी आणि सर्वश्रेष्ठ आहे गायत्री मंत्र, 11 खास गोष्टी

Webdunia
बुधवार, 10 जून 2020 (11:58 IST)
हिंदू धर्मात गायत्री मंत्राला सर्वश्रेष्ठ आणि उत्तम मानले गेले आहेत. हे एकमेव मंत्र आहे जो हिंदू धर्मावर विश्वास ठेवणाऱ्यांचा तोंडी नव्हे तर अन्य धर्माचे लोकांना देखील ह्याची माहिती आहे. बऱ्याच संशोधनामध्ये हे मानले आहे की गायत्रीच्या मंत्राचा जप केल्याने बरेच फायदे होतात.
 
चमत्कारी गायत्री मंत्र :
- ॐ भूर्भुव: स्व: तत्सवितुर्वरेण्यं 
भर्गो देवस्य धीमहि। धियो यो न: प्रचोदयात्।।
 
1 वेदांची संख्या एकूण 4 आहे आणि चारही वेदांमध्ये गायत्री मंत्राचा उल्लेख केलेला आहे. या मंत्राचे ऋषी विश्वामित्र आहे आणि देव सवितृ होय.
 
2 या मंत्रात अशी शक्ती आहे की नियमित तीन वेळा या मंत्राचा जप करणाऱ्यांच्या जवळ पास कोणतीही नकारात्मक शक्ती, भूत-प्रेत आणि वरची बाधा येत नाही.
 
3 गायत्री मंत्राच्या जप केल्याने अनेक प्रकारे फायदे होतात. हा मंत्र सांगतो की आपण त्या प्राणस्वरूप, दुःखनाशक आनंदी, श्रेष्ठ, तेजस्वी, पापनाशक, निराकार देवाला आपल्या मनात ठेवले पाहिजे. देव आमच्या बुद्धीला सन्मार्गाकडे वळण्याची प्रेरणा देवो.
 
4 या मंत्राचा जपामुळे बौद्धिक क्षमता आणि बुद्धिमत्ता वाढते. ज्यामुळे माणसाचे तेज वाढते आणि सर्व दुःख पासून मुक्त होण्याचा मार्ग देखील सापडतो.
 
5 गायत्री मंत्राचा जप सूर्योदयाच्या दोन तासांपूर्वी पासून घेऊन सूर्यास्ताचा एक तासापर्यंत करता येतो.
 
6 मनातल्या मनात देखील हे जप कधीही करू शकतो पण या मंत्राचे जप रात्री करू नये.
 
7 रात्रीच्या वेळी गायत्री मंत्राचे जप केल्याने फायदा होत नाही तर याचा उलटच परिणाम होतो. किंवा काही चुकीचे परिणाम होऊ शकतात. त्यासाठी ही चूक अजिबात करू नये. रात्रीच्या सुमारास गायत्री मंत्राचा जप करू नये.
 
8 गायत्री मंत्रामध्ये 24 अक्षरे असतात जे 24 सिद्धशक्तीचे प्रतीक आहे. हेच कारण आहे की ऋषींनी गायत्री मंत्राला भौतिक जगातील सर्व प्रकारच्या इच्छापूर्ण करणारे मंत्र सांगितले आहे.
 
9 आर्थिक अडचणी बाबतीत गायत्री मंत्र बरोबर श्री चा जप केल्यास आर्थिक अडचणी दूर होतात.
 
10 विद्यार्थ्यांसाठी हा मंत्र खूप फायदेशीर आहे. स्वामी विवेकानंद म्हणाले की गायत्रीमंत्र हा सुज्ञानाचा मंत्र आहे. म्हणूनच ह्याला मुकुटमणी (मंत्राचा मुकुट) असे ही म्हणतात.
 
11 नियमित रूपानं 108 वेळा गायत्रीमंत्राचा जप केल्याने बुद्धिमत्ता आणि कोणत्याही विषयाला दीर्घकाळा पर्यंत आठवण ठेवण्याची क्षमता वाढते. हा मंत्र एखाद्याची बुद्धिमत्ता आणि विवेकाला उजळविण्याचे कार्य करतो.

संबंधित माहिती

Brahmacharini ब्रह्मचारिणी दुर्गेचे दुसरे रूप

श्रीमहादेवकृतरामस्तोत्रम्

संत रामदासांचे अभंग 1 ते 271

Chaitra Gauri 2024: चैत्रांगण चैत्रगौरी पुढे काढली जाणारी रांगोळी

Shri Swami Samarth : श्री स्वामी समर्थांचा जन्म कधी झाला ?

Apple वापरकर्त्यांसाठी मोठा धोका निर्माण, भारतासह 91 देश टार्गेटवर

पुणे पोलिसांनी ट्रान्सजेंडर्सना सण, जन्म आणि ट्रॅफिक सिग्नलवर जबरदस्तीने पैसे मागण्यास बंदी घातली

मुंबईत हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, रो-हाऊसमध्ये 8 आफ्रिकन मुली पकडल्या, 2 जणांना अटक

भाजपचा बडा नेता करणार राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश!

शरद पवार भाजपशी हातमिळवणी करण्यास 50 टक्के तयार होते, प्रफुल्ल पटेल यांचा दावा

पुढील लेख
Show comments