Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Matsya Avatar मत्स्यावतार कथा

Webdunia
शुक्रवार, 19 नोव्हेंबर 2021 (15:04 IST)
कार्तिक पौर्णिमेला भगवान विष्णुने मानव जीवन वाचवण्यासाठी मत्स्य अवतार घेतला होता. हिन्दू पुराणांनुसार एक काळ असा आला होता जेव्हा पृथ्वीवर अतिवृष्टी झाली होती ज्यामुळे संपूर्ण पृथ्वी पाण्यात बुडुन गेली होती, परंतु केवळ कैलास पर्वताची चोटी आणि ओंकारेश्वर स्थित मार्केण्डेय ऋषींचं आश्रम बुडाले नव्हते. जाणून घ्या मत्स्यावताराची शुभ कथा-
 
पौराणिक कथा : द्रविड़ देशाचे राजर्षि सत्यव्रत कृतमाला नदीत स्नान करत होते. तेव्हा त्यांना आपल्या ओंजळीत पाणी घेतलं तर त्यांच्या हातात एक लहान मासा आला. राजाने मासा पुन्हा पाण्यात सोडून दिला. तेव्हा मासा म्हणे की हे राजा नदीत मोठे-मोठे जीव लहान जीवांना खाऊन घेतात, मलाही कोणी मारुन भक्षण करने म्हणून आपण माझ्या जीवाची रक्षा करा.
 
हे ऐकून राजाला आश्चर्य वाटले. त्यांनी मासा कमंडलमध्ये टाकाला परंतु एका रात्रीत माशाचे शरीर इतके वाढले की कमंडल लहान पडू लागले. मग राजाने मासा बाहेर काढून मडक्यात ठेवला. तिथेही एका रात्रीत मासा वाढला. मग राजाने मासा बाहेर काढून त्याला तलावात ठेवले. आता मासा तलावात सोयीस्करपणे मुक्काम करेल याची त्यांना खात्री होती, पण एका रात्रीत तो तलावही माशासाठी खूपच लहान झाला. हे पाहून राजाला आश्चर्य वाटले. तेव्हा राजाला समजले की हा सामान्य मासा नाही.

त्या माशासमोर हात जोडून ते म्हणाला की आपण नक्कीच महान आत्मा आहात हे मला कळले. जर हे खरे असेल तर कृपया मला सांगा की तुम्ही माशाचे रूप का धारण केले आहे?
 
तेव्हा भगवान विष्णू राजर्षी सत्यव्रत यांच्यासमोर प्रकट झाले आणि म्हणाले की हे राजा ! हयग्रीवा या राक्षसाने वेद चोरले आहेत. जगात सर्वत्र अज्ञान आणि अधर्माचा अंधार पसरलेला आहे. हयग्रीवाचा वध करण्यासाठी मी रूप घेईन. आजपासून सातव्या दिवशी महापुराने जमीन समुद्रात बुडवली जाईल. तोपर्यंत तुम्ही एक नाव तयार करा आणि सर्व प्राणीमात्रांचे सूक्ष्म शरीर आणि सर्व प्रकारच्या बिया घ्या आणि सप्‍तर्षींसह त्या बोटीत जा. जोरदार वादळामुळे जेव्हा नाव डळमळीत होईल तेव्हा मी तुम्हा सर्वांचे माशाच्या रूपात रक्षण करेन.
 
तुम्ही नाव माझ्या शिंगाने बांधा. मग मी प्रलयच्या शेवटपर्यंत तुमची बोट ओढत राहीन. त्यावेळी भगवान मत्स्याने नाव हिमालयाच्या शिखरावर बांधली. त्या शिखराला 'नौकाबंध' म्हणतात.

प्रलयाचा क्रोध शांत झाल्यावर भगवान विष्णूने हयग्रीवाचा वध केला आणि त्याच्याकडून वेद हिसकावून पुन्हा ब्रह्मदेवाला दिले. प्रलय संपल्यानंतर परमेश्वराने राजा सत्यव्रत यांना वेदांचे ज्ञान परत दिले. 
 
सत्यव्रत राजाला ज्ञान आणि विज्ञान भरभरून मिळाल्यावर ते वैवस्‍वत मनु म्हणून ओळखले गेले. या बोटीतून वाचलेल्यांपासून जगातील जीवन सुरू झाले.
उल्लेखनीय आहे की हयग्रीव अवतारात भगवान विष्णूची मान आणि चेहरा घोड्यासारखा होता.

संबंधित माहिती

Mahavir Jayanti 2024 Wishes in Marathi महावीर जयंतीच्या शुभेच्छा

रविवारी या प्रकारे सूर्यदेवाची पूजा करा, सर्व दुःख दूर होतील

रविवारी करा आरती सूर्याची

Mahavir Jayanti 2024 : कधी आहे महावीर जयंती

Hanuman Jayanti शुभ योग घडत असल्यामुळे या 3 राशींना मिळणार आर्थिक लाभ !

मोदींच्या वक्तव्यावर कपिल सिब्बल संतापले, म्हणाले पंतप्रधानांना नोटीस पाठवावी

गाण्यातून "जय भवानी" शब्द काढणार नाही... उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला

इंडिया आघाडीत अनेक चेहरे, उद्धव त्यापैकी एक, संजय राऊतांचा काँग्रेसवर पलटवार

Relative Impotency म्हणजे काय? ज्याच्या आधारे हायकोर्टाने दंपतीचे लग्न रद्द केले

14 वर्षांच्या मुलीचा होणार गर्भपात; सर्वोच्च न्यायालयाने दिली परवानगी

पुढील लेख
Show comments