Marathi Biodata Maker

Nirjala Ekadashi निर्जला एकादशीच्या दिवशी नकळत सुद्धा या चुका करू नका

Webdunia
गुरूवार, 9 जून 2022 (16:07 IST)
Nirjala Ekadashi निर्जला एकादशीचा उपवास केल्याने वर्षातील सर्व 24 एकादशींच्या उपवासाचे समान फळ मिळते. म्हणूनच लोक अत्यंत कठीण होऊनही निर्जला एकादशीचे व्रत करतात. निर्जला एकादशीच्या उपवासात उपवासाला पाणी पिण्यासही मनाई आहे. यावर्षी हे व्रत 10 जून 2022, शुक्रवार रोजी ठेवण्यात येणार आहे. हे व्रत केल्याने सर्व पापांचा नाश होऊन पुष्कळ पुण्य प्राप्त होते. हे व्रत जीवनात आर्थिक समृद्धी आणि आनंद देणारे आहे. मात्र निर्जला एकादशीच्या दिवशी काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. या दिवशी केलेल्या काही चुका खूप भारी असतात.
 
निर्जला एकादशीच्या व्रतामध्ये या चुका करू नका
निर्जला एकादशीचे व्रत करणाऱ्यांनी काही चुका टाळल्या पाहिजेत. जे लोक निर्जला एकादशीचे व्रत करत नाहीत त्यांनीही या दिवशी हे काम करू नये.
 
शास्त्रानुसार निर्जला एकादशी व्रत करण्यापूर्वी आणि नंतर भात खाऊ नये. एकादशीच्या व्रतामध्ये भाताचे सेवन करणे मोठे पाप मानले जाते.
 
निर्जला एकादशीच्या व्रतामध्ये उपवास करणाऱ्यांनी मीठाचे सेवन करू नये. तसे, या उपवासात पाणी देखील पिऊ नये, परंतु हे शक्य नसेल तर फळे इ. घ्यावे मात्र मीठाचे सेवन अजिबात करू नका.
 
उपवासाच्या दिवशी खोटे बोलू नका. कुणालाही अपशब्द बोलू नका. ब्रह्मचर्याचे पालन करा.
 
जे लोक निर्जला एकादशीचे व्रत करत नाहीत त्यांनीही या दिवशी तांदूळ, मसूर, मुळा, वांगी आणि फणसाचे सेवन करू नये.
ALSO READ: निर्जला एकादशी व्रत कथा आणि पूजा विधी

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Maha Shivaratri 2026: महाशिवरात्रीला काय करावे आणि काय करू नये?

महाशिवरात्री २०२६: महादेवाच्या पिंडीची पूजा फलदायी की शंकराच्या मूर्तीची? जाणून घ्या शास्त्र काय सांगते!

Mahashivratri 2026 Muhurat महाशिवरात्रीला ग्रहण योग: या वेळी पूजा करणे टाळा; शुभ मुहूर्त जाणून घ्या

Mahashivratri 2026: शिवलिंगावर अभिषेक केल्यानंतर मंदिरातून रिकामा तांब्या का आणू नये?

विनाशातून सृजनाकडे: महाशिवरात्रीचा खरा अर्थ काय?

सर्व पहा

नक्की वाचा

कुंभ राशीत शुक्राचे आगमन, या ५ राशींचे नशीब पालटणार, संपत्ती आणि रोमान्सचे योग!

हृदयविकाराच्या या सुरुवातीच्या लक्षणांबद्दल प्रत्येक व्यक्तीला माहिती असायला हवी

Essay on Growing Population वाढती लोकसंख्या: एक गंभीर समस्या

विंड चाइम वाऱ्याच्या आवाजातून शांत आणि सकारात्मक वातावरण निर्माण करतात

अर्ध नारीश्वर अष्टकम Ardhanareeswara Ashtakam

पुढील लेख
Show comments