Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

विदुर नीती : या 3 स्वभावाच्या लोकांच्या आयुष्यात धनागमन होत नाही

Webdunia
गुरूवार, 10 डिसेंबर 2020 (16:01 IST)
महाभारतातील महत्त्वाचे पात्र महात्मा विदुर यांनी रचलेले नीतीची पुस्तके विदुरनीती हे आहे. या मध्ये लोकांच्या कल्याणासाठी बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहे. असे म्हणतात की महात्मा विदुरांचे धोरण आणि भगवान श्रीकृष्ण बरोबर असल्याने पांडव महाभारताचे युद्ध कौरवांचा पराभव करून जिंकू शकले. विदुरच्या धोरणानुसार, ज्या लोकांमध्ये काही विशिष्ट वाईट सवयी असतात त्यांच्यावर आई लक्ष्मी कधीच कृपा करीत नाही. असे लोक नेहमीच पैशा साठी तळमळतात.
 
1 आळशी -
विदुर म्हणतात की आळशी लोकांवर कधीही लक्ष्मी कृपा करीत नाही. अशा लोकांना नेहमी नशिबासाठी रडावे लागते. महात्मा विदुर म्हणतात की जे लोक आळशी असतात, ते लोक स्वतःचेच  वाईट करण्यासाठी कारणीभूत असतात. आळस हा माणसाचा सर्वात मोठा वैरी मानला आहे.आळसच दारिद्र्य आणतो. जे लोक आळशी असतात त्यांना आपल्या आयुष्यात धनाचा अभाव सहन  करावा लागतो.
 
2 कामचुकार लोक -
विदुर म्हणतात की कठोर परिश्रम हीच यशाची पायरी असते. पण जे लोक कामाचा कंटाळा करतात,त्यांच्या कडे कधीही पैसे येत नाही. काही लोक अशी असतात ज्यांना बसूनच प्रगती,यश आणि काम मिळवायचे असते. पण खरं तर त्यांची ही इच्छा पूर्ण होत नाही. कोणतेही ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करणे खूप आवश्यक आहे. जे लोक परिश्रम करीत नाही त्यांचा वर ईश्वर देखील कृपा करीत नाही.
 
 
3 देवावर विश्वास न करणारे -
विदुर म्हणतात की जे लोक देवावर विश्वास करीत नाही त्यांच्या वर ईश्वराची कृपा होत नाही. असे लोक दारिद्र्यात आपले आयुष्य घालवतात. माणसाला नेहमी देवावर विश्वास ठेवायला पाहिजे. दररोज आपल्या मनात भगवंताचे स्मरण करा. शक्य असल्यास घरात धुपकांडी आणि दिवा लावावा.

संबंधित माहिती

श्री आनंदनाथ महाराज कृत श्रीगुरुस्तवन स्तोत्र

पती-पत्नीच्या वयात किती फरक असावा?

आरती मंगळवारची

श्री स्वामी समर्थ आरती Swami Samarth 3 Aartis

श्री स्वामी समर्थ काकड आरती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

पुढील लेख
Show comments