Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जपानमध्ये 7.6 रिश्टर स्केलचा भूकंप, त्सुनामीच्या लाटा उसळण्यास सुरुवात

Earthquake in Japan
Webdunia
सोमवार, 1 जानेवारी 2024 (17:23 IST)
- केली एनजी
जपानमध्ये 7.6 रिश्टर स्केलच्या भूकंपानंतर त्सुनामीचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार आता देशात त्सुनामीच्या लाटा उसळू लागल्या आहेत.
 
जपानमधून येत असेल्या वृत्तांनुसार, देशाच्या मध्यवर्ती भागात काही मीटर उंच त्सुनामीच्या लाटा उसळू लागल्या आहेत. या लाटा या भागातील किनारपट्टीपर्यंत पोहोचू लागल्या आहेत.
 
जपानच्या राष्ट्रीय प्रसारक एनएचके (NHK) ने सांगितलं, "इशिकावा प्रांतातील वाजिमा शहरात 1.2 मीटर उंच समुद्राच्या लाटा दिसल्या. तोयामा प्रांतातील तोयामा शहरातही त्सुनामीमुळे समुद्रात लाटा उसळताना दिसत होत्या.
 
"इशिकावा प्रांतातील किनारी नोटो भागातील रहिवाशांना "ताबडतोब उंचवटा असणाऱ्या भागात जाण्यास सांगितलं गेलं आहे."
 
जपानच्या हवामान विभागाने 'या भागातील लाटा 5 मीटरपर्यंत पोहोचू शकतात,' असा इशारा दिला आहे.
 
अधिकाऱ्यांनी शेजारच्या निगाटा आणि तोयामा प्रांतांसाठी देखील त्सुनामीचा इशारा जारी केला आहे.
 
या भागात तीन मीटर उंचीच्या लाटा उसळतील, असा इशारा देण्यात आला आहे.
 
2011 मध्येही जपानमध्ये जोरदार भूकंप झाला होता. यानंतर त्सुनामी येऊन खूप नुकसान झालं होतं. यामुळे हजारो लोकांना जीव गमवावा लागला होता.
 
2011 मध्ये आलेल्या त्सुनामीमुळे जपानचा अणु प्रकल्प पूर्णपणे उद्ध्वस्त झाला होता.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चारधामची यात्रा यमुनोत्रीपासूनच का सुरू होते? यामागील धार्मिक कारण जाणून घ्या...

Sant Gora Kumbhar महाराष्ट्रातील संत गोरा कुंभार संपूर्ण माहिती

लग्नात जेवण करताना या चुका करू नका, वास्तु नियम पाळा अन्यथा आरोग्य बिघडू शकते

स्वामी विवेकानंदांचे हे विचार तुमचे जीवन बदलतील आणि यशाच्या शिखरावर नेतील

उन्हाळ्यात सेवन करा थंडगार Fennel syrup

सर्व पहा

नवीन

प्रकाश आंबेडकर यांनी पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्र सरकारची तत्परता घाईघाईची असल्याचे म्हटले

LIVE: मुख्यमंत्र्यांनी नवीन इलेक्ट्रिक एसी बस मार्ग ए-३० ला हिरवा झेंडा दाखवला

नितेश राणे दहशतवाद्यांची भाषा बोलत आहे म्हणाले महाराष्ट्र समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अबू आझमी

UPSC परीक्षा उत्तीर्ण होऊ शकली नाही, विद्यार्थिनीने गळफास घेत केली आत्महत्या

हा नवा भारत कोणालाही छेडत नाही, पण जर कोणी छेडले तर ते त्याला सोडणार नाही-योगी आदित्यनाथ

पुढील लेख
Show comments