Festival Posters

डोकलाम वाद : चीनकडून भारताने माघार घेतल्याचा दावा

Webdunia
भारताने वादग्रस्त डोकलाम भागातून आपले सैन्य मागे घेतले असल्याचा दावा चीनने केला असून आपले सैनिक मात्र या भागात गस्त घालणारच असे म्हटले आहे. विशेष म्हणजे, दोन्ही देशांचे सैन्य या भागातून मागे घेण्यात येत असल्याचे भारताने जाहीर केल्यानंतर काही तासांमध्येच चीनने भारताने माघार घेतल्याचा दावा केला आहे, असे वृत्त एका वृत्तसंस्थेने दिले आहे.
 
भारताच्या सिक्कीम सीमेजवळ भूताननजीकच्या डोकलाम भागामध्ये दोन महिन्यांपेक्षा जास्त काळासाठी भारत व चीनमध्ये तणाव स्थिती आहे. या भागात चीन रस्ते बांधत असून ते भारतासाठी धोक्याचे असल्याचे भारताने म्हटले तर, चीन आपल्या स्वायत्ततेत्या बाबतीत कुठलीही तडजोड करणार नाही असं सांगत चीनने आक्रमक भूमिका कायम ठेवली. यामुळे दोन्ही देशांचे सैन्य समोरा समोर ठाकले आणि 1962 नंतर प्रथमच एवढी तणावाची वेळ दोन्ही देशांदरम्यान आली. मात्र, सोमवारी भारतीय परराष्ट्र खात्याने तणाव निवळत असल्याचे व दोन्ही देशांचे सैन्य मागे घेण्यात येत असल्याचे सांगत चांगली बातमी दिली.  या वृत्तास चिनी ग्लोबल टीव्ही नोटवर्कनेही दुजोरा दिला. मात्र, आता त्यानंतर आलेल्या चीनच्या या पवित्र्यानंतर तणाव निवळल्याच्या वृत्ताबाबतच संशय निर्माण झाला आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shree Mangeshi Rathyatra Goa 2026 श्री मंगेशी रथयात्रा गोवा बद्दल संपूर्ण माहिती

संत तुकाराम महाराजांचे ५ अभंग जे तुमचे जीवन बदलू शकतात

Essay on Corruption: भ्रष्टाचार: देशाच्या प्रगतीतील मोठा अडथळा

Weight Loss Recipe वजन कमी करायचे आहे? नाश्त्याला बनवा कमी तेलातले बाजरीचे अप्पे

नवर्‍याला 'अहो' म्हणण्यामागे दडलंय तरी काय? मराठी संस्कृतीतील त्यामागचे खास कारण माहित आहे का!

सर्व पहा

नवीन

लोकसभा अर्थसंकल्पीय अधिवेशन; लोकसभेतील गोंधळावर सभापती ओम बिर्ला यांचे विधान, पंतप्रधान मोदींना सभागृहात प्रवेश नाकारण्यात आला

या’ रेशनकार्डधारकांची 'ही' सुविधा बंद;

क्रिकेटच्या नियमांमध्ये बदल

LIVE: रोहित पवार यांनी १२ जिल्हा परिषदांच्या निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्याचे आवाहन केले

जळगावच्या जंगलात अर्धवट जळालेल्या महिलेचा मृतदेह सापडला, परिसरात खळबळ उडाली

पुढील लेख
Show comments