Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जगातील अनेक देशांमध्ये उष्णतेची लाट

Webdunia
शनिवार, 3 जुलै 2021 (08:13 IST)
पाकिस्तानहून येणार्यां गरम वार्या मुळे भारतातील बरीच राज्यांना ज्वलंत उष्णतेचा सामना करावा लागत आहे, परंतु पाकिस्तानमधील परिस्थितीही अत्यंत वाईट आहे. येथे तापमान इतके वाढले आहे की इथले शहर पृथ्वीवरील सर्वात गरम ठिकाण बनले आहे. पाकिस्तानमधील तापमान 52 डिग्री सेल्सिअसपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. ज्या शहरात सर्वात तीव्र उष्मा पडतो त्या शहराचे नाव जाकोबाद आहे. हे सिंध प्रांतात आहे.
 
टेलीग्राफ वर्तमानपत्राने तज्ज्ञांच्या हवाल्यात म्हटले आहे की इथ तापमान इतके जास्त आहे की मानवी शरीर ते सहन करू शकत नाही. उन्हामुळे रस्ते ओसाड झाले आहेत. पण लोकांना घरातही आराम मिळत नाही. कारण पृथ्वी खूप गरम झाली आहे. येथे एसी (World’s Hotest Place Temperature) असणारे बरेच लोक आहेत. परंतु वीज कपातीमुळे त्यांनाही समस्या भेडसावत आहेत. टेलीग्राफच्या अहवालानुसार उष्मा आणि आर्द्रतेमुळे जैकोबाबाद जगातील दोन सर्वात गरम  ठिकाणी सामील झाले आहे.
 
जगातील अनेक देशात देशांमध्ये हवामानात मोठे बदल झाल्यामुळे तापमानात प्रचंड वाढ होऊन उष्णतेची लाट पसरली आहे.या मध्ये केनेडा,उत्तर आफ्रिका अरबी,द्वीप,सह वायव्य भारतातील उपखंडच्या काही भागात तापमानात वाढ झाली आहे.देशाची राजधानी दिल्लीचे सर्वात उष्ण तापमान होते. राजधानीतील उष्णता दररोज नवीन विक्रम करीत होती. गेल्या काही दिवसांपासून कडक उन्हामुळे सर्वजण त्रस्त झाले होते. दिल्ली-एनसी आर मधून मान्सूनही रुसला आहे. जूनमध्ये, हवामान खात्याने 15 जूनपर्यंत दिल्ली-एनसीआरमध्ये मान्सून येण्याची शक्यता वर्तविली होती, 15 जूनपर्यंत भौगोलिक परिस्थितीमुळे हा अंदाज चुकीचा असल्याचे सिद्ध झाले. जुलैचा पहिला दिवस गेल्या 89 वर्षातील सर्वात उष्ण दिवस होता 
 
1931 नंतर प्रथमच जास्तीत जास्त तापमान 43.6 डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचला.याच बरोबर, किमान तापमान देखील गेल्या दशकात सर्वाधिक 31.7 अंश सेल्सिअस होते. दुसरीकडे, दिल्लीच्या लोकांनी सलग तिसर्या  दिवशीही उष्णता सहन केली. 
 
हवामान खात्याने आणखी एक अंदाज वर्तविला होता की दिल्ली-एनसीआरमध्ये जुलैच्या सुरूवातीस चांगला पाऊस पडेल, परंतु जुलैच्या पहिल्या दिवशी झालेल्या उन्हाने 89 वर्षांचा विक्रम मोडला. पण जुलैच्या दुसर्यात दिवशी दिल्लीच्या अनेक भागात मुसळधार पावसाने जनतेला दिलासा दिला. 

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments