rashifal-2026

प्रकाश आंबेडकर यांची मोठी घोषणा भारिप बहुजन महासंघ पक्ष बहुजन वंचित आघाडीत विलीन

Webdunia
गुरूवार, 14 मार्च 2019 (17:04 IST)
अकोला येथे ‘भारिप बहुजन महासंघ’ पक्ष वंचित बहुजन आघाडीत विलीन करण्याची घोषणा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि पक्षाचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरयांनी केली आहे. अकोला येथे निवासस्थानी पत्रकार परिषदेत त्यांनी घोषणा केली आहे.

आंबेडकर म्हणाले की ‘भारिप-बहुजन महासंघाच्या माध्यमातून सामाजिक अभियांत्रिकीचा ‘अकोला पॅटर्न’ला यश मिळाले आहे. मात्र ‘भारिप’ या शब्दामुळे पक्षाच्या विस्ताराला फार मर्यादा होत्या, वंचित बहुजन आघाडी ही व्यापक अर्थाने स्वीकारार्ह झाली असून, या लोकसभा निवडणुकीनंतर वंचित बहुजन आघाडीत भारिप-बमसं विलीन करणार आहे असे त्यांनी स्पष्ट केले आहे. 
 
लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी निश्चितच सक्षम पर्याय म्हणून समोर येणार असून, निवडणुकीचे निकाल काहीही लागेतील मात्र आमचा पुढील प्रवास हा वंचित बहुजन आघाडी याच बॅनर खाली होणार आहे. असे त्यांनी सांगितले. देशात सध्या दबावतंत्राचे, नात्यागोत्याचे जोरदार राजकारण सुरू असून जतनेला काय वाटते, त्यांना खुश कसे ठेवता येईल याचा विचार न करता आपल्या नातेवाईकांना कसे खुश ठेवता येईल, याचाच विचार केला जात असल्याचा टीका त्यांनी केली आहे. भाजपा सरकार हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचाराने चालत असून संघाची विचारधारा ही देशाला घातक आहे असे आंबेडकर यावेळी म्हणाले आहे. यावेळी प्रदेश प्रवक्ते प्रा.धैर्यवर्धन पुंडकर, राजेंद्र पातोंडे, जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे आदी उपस्थित होते.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

"मला मुख्यमंत्र्यांची दया येते," उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांवर निशाणा साधला

LIVE: उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर मंत्रिमंडळातील "भ्रष्ट" सहकाऱ्यांना संरक्षण देण्याचा आरोप केला

पैसे दुप्पट करण्यासाठी तीन जणांनी जीव गमावला! तांत्रिक विधीदरम्यान झालेल्या गूढ मृत्यूंमुळे खळबळ

नाशिकमध्ये भीषण आग! दुकाने जळून खाक

अमित शाह आणि मोहन भागवत अंदमान आणि निकोबारला भेट देणार, सावरकरांच्या पुतळ्याचे अनावरण होणार

पुढील लेख
Show comments