Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

किरीट सोमय्या नकोच मागणीवर शिवसैनिक ठाम मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी

Webdunia
बुधवार, 27 मार्च 2019 (17:55 IST)
राज्यात शिवसेना-भाजप ने युती केली आणि पुन्हा कार्यकर्ते एकत्र आलेले आहेत. मात्र मुंबईत वेगळे वातावरण असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेनेमध्ये बैठक झाली. यात भाजप नेते आणि खासदार किरीट सोमय्यांना ईशान्य मुंबईतून तिकीट देऊच नका, अशी थेट मागणी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्यामुळे किरीट सोमय्या यांच्या तिकीट मिळण्याच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.
 
किरीट सोमय्या आणि शिवसैनिक यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. त्याचाच परिणाम म्हणून शिवसैनिकांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सोमय्यांची तक्रार 
 
करत त्यांना तिकीट देऊच नका अशी भूमिका घेतली आहे. भाजपनेही अजूनही ईशान्य मुंबईच्या उमेदवाराची घोषणा केलेली नाही. त्यामुळे आगामी लोकसभा 
 
निवडणुकीसाठी या मतदारसंघातून नेमकी कुणाला उमेदवारी मिळणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. भाजपमध्ये ईशान्य मुंबईत कुणाला तिकीट द्यायचे 
 
याबाबत भाजपा विचार करत आहे. किरीट सोमय्या यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर मनपा निवडणुकीत जोरदार टीका केली होती, त्यामुळे 
 
शिवसेना नाराज आहे. सोमय्या उभे राहिले तर त्यांना कोणतीही मदत करणार नाही अशी भूमिका शिवसैनिकांनी घेतली आहे. त्यामुळे भाजपा अडचणीत सापडली 
 
आहे. 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments