Dharma Sangrah

अखेर जगातील पहिल्या हायपरपूलला राज्य सरकारची मान्यता किती मिनिटात कापणार मुंबई पुणे अंतर जाणून घ्या

Webdunia
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019 (17:01 IST)
आर्थिक राजधानी मुंबई येथून फक्अत अर्ध्या तासात सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे गाठण्याचं स्वप्न येत्या काही वर्षांत प्रत्यक्षात उतरणार असून, विमानाने नव्हे, तर ‘हायपरलूप’ च्या माध्यमातून ही दोन शहरं केवळ 31 मिनिटांच्या अंतरावर जोडली जाणार आहे. राज्य सरकारने ‘वर्जिन हायपरलूप’ व ‘डीपी वर्ल्ड’ यांच्या कराराला पूर्ण  मान्यता दिली. जगातील पहिला हायपरलूप ट्रॅक मुंबई आणि पुणे या दोन शहरांदरम्यान सुरु होणार आहे. या हायपरलूप प्रकल्पामुळे मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या वेळेची फार मोठी  बचत होणार आहे. तर रोजगाराच्या हजारो  संधी उपलब्ध होतील. हा प्रकल्प 36 बिलियन डॉलर म्हणजेच (अंदाजे 2 लाख 50 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक) आर्थिक नफा होईल, असाही अंदाज राज्य सरकारने व्यक्त केला आहे. मुंबईहून पुणे गाठण्यासाठी साडेतीन तासांचा अवधी लागतोच मात्र येत्या भविष्यात वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे वाहतूक व्यवस्था अधिक बिकट होईल. यामध्ये मग मुंबई-पुणे हायपरलूप ट्रेन (किंवा पॉड)ने केवळ 31 मिनिटांत हे अंतर गाठता येईल. मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांचा हा महत्वकांक्षी प्रकल्प असणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

सर्व पहा

नवीन

20 डब्यांची वंदे भारत एक्सप्रेस 26 जानेवारीपासून या मार्गावर धावणार

Republic Day 2026 Wishes in Marathi प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

Republic Day 2026 Essay in Marathi प्रजासत्ताक दिनावर मराठी निबंध

ज्येष्ठ पत्रकार मार्क टली यांचे वयाच्या 90 व्या वर्षी निधन

LIVE: भाजपला रोखण्यासाठी सोलापुरात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले

पुढील लेख
Show comments