Festival Posters

मोबाईल कंपन्याचा तुम्हाला त्रास तुम्ही करा या प्रकारे ट्राय कडे तक्रार

Webdunia
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019 (16:08 IST)
सध्या मोबाईलवरील कॉल ड्रॉपची समस्या अनेकांच्वाया डोक्ढयाला ताप बनली आहे. अनेकदा दिवसभरात दोन-चार कॉल ड्रॉप होतात. देशभरात असलेल्या अनेक नेटवर्कची ही समस्या असून, कॉल ड्रॉप झाल्यानंतर आपण पुन्हा एक दोनवेळा कॉल करुन, संभाषण संपवतो. मात्र आपण तक्रार करायच्या भानगडीत पडत नाही. आता मात्र टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात TRAI ने अशा समस्यांचं निराकरण करण्यासाठी अनेक अॅप उपलब्ध करुन दिली. कॉल ड्रॉप, केबल किंवा टीव्हीला मिळणारं नेटवर्क या सर्वांच्या तक्रारी तुम्ही येथे करु शकणार आहात. ट्रायचे माय कॉल अॅप (TRAI MyCall) आहे, त्यावरुन तुम्ही तक्रार करु शकता. TRAI कडे तक्रार कशी करायची? तर तुम्ही सर्वात आगोदर  MyCall app हे अद्ययावत अॅप डाऊनलोड करायचे आहे. हे डाऊनलोड केल्यानंतर अॅप आवश्यक परवानगी मागेल, जसे कॉन्टॅक्ट, कॉल हिस्ट्री, मेसेज, लोकेशन वगैरे ती द्यायची गरज आहे. तुमच्या फोनवरुन एखाद्याला कॉल करा किंवा एखाद्याला तुमच्या नंबरवर कॉल करायला सांगा आणि कॉल जसा कट किंवा डिस्कनेक्ट होईल, तेव्हा एक पॉप-अप विंडो तुम्सहाला दिसणार आहे. तिथे तुम्हा कॉलला रेटिंग देण्याबाबत विचारना होणार आहे. तुम्हाला आलेल्या अनुभवानुसार संबंधित कॉलला तुम्ही रेटिंग द्यायचे आहे. जर तुमचा कॉल ड्रॉप झाला असेल, तर कॉल ड्रॉप बटणावर क्लिक करावं लागेल आणि त्यानंतर सबमिट बटण दाबा, तुमच्या समस्येची नोंद होईल. यामुळे तुमची तक्रार न ऐकणारा तुमच्या ऑपरेटरला ट्राय ही समस्या दूर करायला सांगेल सोबतच ती दूर झाली नाही तर दंड देखील देणार आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मास कधीपर्यंत असेल? या पवित्र महिन्यात या ५ शुभ गोष्टी केल्यास तुमचे भाग्य उजळेल

देवाला अर्पण केलेल्या वस्तूंचा पुनर्वापर करता येतो का? जाणून घ्या शास्त्रानुसार याचे नियम

Career in BSc in Respiratory Therapy : बीएससी इन रेस्पिरेटरी थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

त्वचेसाठी तुरटीचे हे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

महागड्या स्प्रेपेक्षा घरगुती उपाय जास्त प्रभावी; आरसे स्वच्छ करण्याची योग्य आणि सोपी पद्धत येथे पहा

सर्व पहा

नवीन

मुंबई झोपडपट्टीमुक्त होईल, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी 'झोपडपट्टी समूह पुनर्विकास योजने'वर भर देत घोषित केले

नक्षलमुक्त भारत: गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत दावा केला आहे की, भारतातून नक्षलवाद समूळ नष्ट झाला

LIVE: पुढील ४८ तासांत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा येलो अर्लट जारी

कुख्यात दहशतवाद्यासह नऊ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले; आंध्र प्रदेशातील नक्षलवाद संपुष्टात आला

राजा रघुवंशी हत्याकांड : कुटुंब म्हणाले आमचा मुलगा परत आला; राजा रघुवंशीच्या मृत्यूनंतर बाळाचा जन्म

पुढील लेख
Show comments