Dharma Sangrah

या विहिरीच्या पाण्यात कोणत्याही वस्तूचा बनतो दगड

Webdunia
मंगळवार, 13 मार्च 2018 (10:40 IST)
जगामध्ये काही अशी भीतीदायक व गूढ स्थळे आहेत, ज्यांचे नाव घेतले तरी लोकांच्या छातीत धडधडू लागते. ब्रिटनच्या न्यूर्जबरमधील एका विहिरीचे पाणी अशाच दहशतीसाठी जगभर ओळखले जाते. असे सांगतात की, या विहिरीच्या पाण्यात जे काही पडते, त्याचे दगडात रुपांतर होते. या अनोख्यापणामुळेच स्थानिक या विहिरीला राक्षसी विहीर मानतात. तिच्या पाण्यात पडणारी झाडाची पाने, लाकडे वा एखादा जीव सगळ्यांचाच दगडामध्ये कायापालट होतो. नदीच्या काठावर असलेल्या या विहिरीजवळ जाणे कुणीच पसंत करत नाही. स्थानिकांच्या माहितीनुसार, समजा तेही या विहिरीच्या संपर्कात आले तर कदाचित दगडामध्ये परावर्तीत होतील. मात्र या विहिरीच्या पाण्याच्या या वैशिष्ट्याचे कोडे अजूनही उलगडलेले नाही. या भागात सहलीसाठी येणारे लोक आपल्या काही वस्तू या विहिरीच्या पाण्यात सोडून जातात व नंतर काही दिवसांनी येऊन त्यांचा दगड बनलेला पाहतात. तिथे आजही 18व्या शतकातील व्हिक्टोरियन टॉप हॅटसारख्या वस्तू पाहण्यास मिळतात. टेडी बियर, सायकल व किटलीसारख्या वस्तूही आता पूर्णपणे दगडात बदलल्या आहेत. आता हे स्थान पर्यटनस्थळाच्या रुपातही विकिसत होत आहे. शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनात असे दिसून आले की, या विहिरीच्या पाण्यात कोणत्याही वस्तूचा दगडामध्ये कायापालट करू शकणारे काही घटक मोठ्या प्रमाणात आहेत. अर्थात लोक मात्र या विहिरीला झपाटलेली सजतात.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

LIVE: देशातील पहिले एआय आयुक्तालय महाराष्ट्रात सुरू होणार

समीर वानखेडे प्रकरणात एनसीबीकडून मोठा खुलासा, नवाब मलिक यांचा सहभाग नाही!

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मूळ गावी दहशत निर्माण करण्याचा कट? स्फोटकांचा साठा सापडला

दिल्ली कॅपिटल्सला हॅटट्रिक करण्यापासून रोखून गुजरात आपला पहिला विजय मिळवण्याच्या प्रयत्नात राहील

११ षटकांच्या सामन्यात राजस्थानने मुंबईला २७ धावांनी हरवले

पुढील लेख
Show comments