Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबई इंडियन्सचं आयपीएलमधलं आव्हान अखेर साखळीतच संपुष्टात

Webdunia
सोमवार, 21 मे 2018 (08:48 IST)

मुंबई इंडियन्सचं आयपीएलमधलं आव्हान अखेर साखळीतच संपुष्टात आलं  आहे. त्यामुळे रोहित शर्मासह   खेळाडूना मोठा धक्का बसला आहे.  दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून अकरा धावांनी मुंबई इंडियन्सला अखेरच्या साखळी सामन्यात  पराभव स्वीकारावा लागला   आहे.  या पराभवामुळंच मुंबईचं आयपीएलमधलं आव्हान संपुष्टात आले आहे.  दिल्लीनं मुंबईला विजयासाठी 175 धावांचं आव्हान दिलं होतं ,  दिल्लीने मुंबईचा ११ धावांनी पराभव करत स्पर्धेचा शेवट गोड केला आहे. दिल्लीचा संघ याआधीच आयपीएलमधून बाहेर गेला आहे. मुंबईने २०१३, २०१५ आणि २०१७ मध्ये आयपीएलचा चषक  जिंकला होता.  लमिछानेनं 36 धावांत तीन, तर मिश्रानं 19 धावांत तीन फलंदाजांना माघारी धाडलं. त्याआधी रिषभ पंत आणि विजय शंकर यांच्या चमकदार फलंदाजीनं दिल्लीला चार बाद 174 धावांची मजल मारून दिली होती. पंतनं 64 धावांची, तर विजय शंकरनं नाबाद 43 धावांची खेळी केली होती ,  मुंबईच्या दोन्ही सलामीविरांना फिरकीपटूंनी बाद केले. मुंबईचे १० पैकी ६ फलंदाजांना फिरकपटूंनी बाद केले त्यामुळे मुंबईचा पराभव झाला. सूर्यकुमार, ल्युईस, किशन, कृणाल आणि हार्दिक पांड्या, पोलार्ड ही आघाडीची फळी दिल्लीच्या फिरकीमुळे आउट झाली आहे.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments