rashifal-2026

राज ठाकरे तब्बल 14 वर्षांनंतर दिल्लीत दाखल

Webdunia
सोमवार, 8 जुलै 2019 (09:38 IST)
मनसे प्रमुख राज ठाकरे तब्बल 14 वर्षांनंतर दिल्ली आले आहेत. यावेळी राज ठाकरे देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांची सोमवारी (8 जुलै) दुपारी 12 वाजता दिल्लीत भेट घेणार आहेत. यासाठी राज ठाकरे दिल्लीमध्ये दाखल झाले. या भेटीचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट असलं तरी ईव्हीएम विरोधातील आपली भूमिका राज निवडणूक आयुक्तांकडे स्पष्ट करणार असल्याची चर्माचा आहे. 
 
याआधी 2005 ला मध्ये माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांना ‘बाळ केशव ठाकरे, अ फोटोबायोग्राफी’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे आमंत्रण देण्यासाठी दिल्लीत गेले होते. त्यानंतर अटल बिहारी वाजपेयी, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि अनेक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील गेट वे ऑफ इंडियाच्या प्रांगणात या पुस्तकाचे प्रकाशन झाले होते.
 
दरम्यान, राज ठाकरेंचे पंतप्रधान नरेंद्र मोदींशी विद्यार्थ्यांना त्रासदायक ठरलेल्या नीट परीक्षेच्या नियमांबद्दल दूरध्वनीवर बोलणे झाले होते. त्यावेळी मोदींनी राज ठाकरेंना दिल्लीत सदिच्छा भेट देण्याचे आणि स्नेहभोजनाचे आमंत्रण दिले होते. मात्र, राज ठाकरेंचे दिल्लीला जाणे झालेच नाही. त्यानंतर राज ठाकरे मुलगा अमितच्या लग्नाची पत्रिका तत्कालिन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना देण्यासाठी जानेवारी महिन्यात स्वतः दिल्लीला जाणार होते, अशी चर्चा झाली. मात्र, त्यावेळीही ते दिल्लीला गेलेच नाही. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shree Mangeshi Rathyatra Goa 2026 श्री मंगेशी रथयात्रा गोवा बद्दल संपूर्ण माहिती

संत तुकाराम महाराजांचे ५ अभंग जे तुमचे जीवन बदलू शकतात

Essay on Corruption: भ्रष्टाचार: देशाच्या प्रगतीतील मोठा अडथळा

Weight Loss Recipe वजन कमी करायचे आहे? नाश्त्याला बनवा कमी तेलातले बाजरीचे अप्पे

नवर्‍याला 'अहो' म्हणण्यामागे दडलंय तरी काय? मराठी संस्कृतीतील त्यामागचे खास कारण माहित आहे का!

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्र सरकारने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची पुणे आणि बीडच्या पालकमंत्री म्हणून नियुक्ती केली

नागपूर रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाचे काम 15 महिन्यांत पूर्ण होईल

जुन्नर मध्ये दुचाकीची धडक होऊन अपघातात तरुणाचा मृत्यू

सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना ‘सूर्यदत्त जीवनगौरव पुरस्कार देण्याची घोषणा

15 फेब्रुवारीनंतर नवीन खरेदीवर बंदी, राज्य सरकारच्या निर्णय

पुढील लेख
Show comments