Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

काय आहे 5 लाखाचे इमरजेंसी कर्जाचे सत्य, SBI ने ग्राहकांना केलं सावध

SBI big statement on emergency loan of 5 lakhs
Webdunia
बुधवार, 13 मे 2020 (14:57 IST)
सध्या कोरोनाच्या काळात सोशल मीडियावर अनेक प्रकारांच्या अफवा आणि बनावटी बातम्या सुरू आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियाने स्पष्टीकरण दिले आहे की ते आपल्या योनो (yono) प्लॅटफॉर्म च्या माध्यमातून आपल्या ग्राहकांना कोणत्याही प्रकारचे आपत्कालीन कर्ज किंवा आणीबाणीचे कर्ज देत नाहीत. 
 
बातमी अशी येत आहे की एसबीआय 45 मिनिटात 5 लाख रुपयापर्यंत आणीबाणी कर्ज देऊ बघत आहे. ग्राहकांना हे कर्ज 10.5 टक्क्यांचा व्याजदराने दिले जातील. या कर्जाची ईएमआय(EMI) 6 महिन्यानंतर सुरू होईल.
 
एसबीआयने यावर आपले स्पष्टीकरण देत सांगितले आहे की योनोमार्फत एसबीआय द्वारा आपत्कालीन किंवा आणीबाणीच्या कर्ज योजनेतंर्गत आम्ही कोणतेही ऋण देत नाहीये. आम्ही आपल्या ग्राहकांना अश्या प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका अशी विनंती करीत आहोत.
 
एसबीआयने ट्विट करून आपल्या ग्राहकांना सतर्क केले आहे. परंतु एसबीआयने असे ही म्हटले आहे की ते आपल्या पगार झालेल्या ग्राहकांना दिलासा मिळावा या दृष्टीने योनो मार्फत पूर्व मंजूर वैयक्तिक (प्री-अप्रूव्ड पर्सनल लोन) कर्जाची ऑफर सुरू करण्याचा विचार करत आहे. 
 
कोरोना व्हायरसच्या वैश्विक महामारीने निर्माण झालेल्या संकटामुळे ग्राहक रोख(नगदी)च्या समस्येशी झटत आहे. त्यांच्यासाठी ही सुविधा सुरू करण्याचे काम चालले आहे.
 
योनो म्हणजेच 'यू ओनली नीड वन', एसबीआयचा एक डिजीटल प्लॅटफार्म असून या द्वारे एसबीआय 
आपल्या ग्राहकांना बँकिंग, शॉपिंग लाइफस्टाइल, आणि गुंतवणुकीच्या गरजेसाठी एकाच ठिकाणी समाधान मिळवून देतं. योनो हे ऍप एसबीआय ने नोव्हेंबर 2017 मध्ये आणले होते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चारधामची यात्रा यमुनोत्रीपासूनच का सुरू होते? यामागील धार्मिक कारण जाणून घ्या...

Sant Gora Kumbhar महाराष्ट्रातील संत गोरा कुंभार संपूर्ण माहिती

लग्नात जेवण करताना या चुका करू नका, वास्तु नियम पाळा अन्यथा आरोग्य बिघडू शकते

स्वामी विवेकानंदांचे हे विचार तुमचे जीवन बदलतील आणि यशाच्या शिखरावर नेतील

उन्हाळ्यात सेवन करा थंडगार Fennel syrup

सर्व पहा

नवीन

LIVE: केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पंतप्रधान मोदींकडे एक खास मागणी केली

जर पाकिस्तानने पीओके देण्यास नकार दिला तर भारताने युद्ध करावे', आठवलेंची पंतप्रधान मोदींकडे मागणी

मुंबईतील ईडी कार्यालयात भीषण आग

२६/११ दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणाच्या कोठडीत १२ दिवसांची वाढ, एनआयए न्यायालयाचा निर्णय

'दहशतवाद संपला पाहिजे पण त्यावर राजकारण होऊ नये', पहलगाम हल्ल्यानंतर अबू आझमी यांचे मोठे विधान

पुढील लेख
Show comments