Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भाजप 200 पण पार करणार नाही, आदित्य ठाकरेंचा भाजपला टोला

Webdunia
मंगळवार, 23 एप्रिल 2024 (23:03 IST)
भाजप जरी अबकी बार 400 पार म्हणत असली तरीही भाजप यंदाच्या निवडणुकीत 400 काय तर 200 देखील पार करणार नाही. भाजपला, गद्दारांना, महाराष्ट्राचा द्वेष करणाऱ्यांना मतदाता कधीही मतदान करणार नाही.असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी भाजपला टोला लगावला आहे. 
 
मावळ लोकसभा मतदार संघासाठी उबाठा आणि महाविकास आघाडीचे आकुर्डीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला.त्यावेळी पदयात्रा काढण्यात आली. त्यात आदित्य ठाकरे बोलताना म्हणाले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष जनतेची आणि कार्यकर्त्यांची काळजी घेणारा पक्ष आहे. आता देशात परिवर्तन होणार असून आता भाजपचे सरकार परत येणार नाही.यंदा अबकी बार भाजप तडीपार करण्याची गरज आहे.   

भाजप मुळे युवकांचे रोजगार हिरावले, नोकरीची संधी आली नाही. आमचा गुजरातला विरोध नाही. पण महाराष्ट्र, आसाम, केरळ आणि मणिपूरला त्यांचे हक्काचे मिळालेच पाहिजे. या सरकार मध्ये गुंड रील काढतात. बलात्कार करण्याला फाशी झालीच पाहिजे. पण भाजपकडून बलात्काऱ्यांना वाचविण्याचे काम केले जाते. महागाईमुळे जनतेचे जगणे कठीण झाले आहे. उद्धव ठाकरे सरकार ने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. मात्र भाजप शेतकऱ्यांवर  
लाठ्या-काठ्या चालविल्या, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.
 
 
Edited By- Priya Dixit 

संबंधित माहिती

चारधाम यात्रा मार्गावर रस्ता अपघात,भाविकांची कार उलटून 8 जण जखमी

Chess: अर्जुन एरिगेसीला शारजाह मास्टर्समध्ये प्राधान्य

मेक्सिकोच्या चियापासमध्ये झालेल्या गोळीबारात 11 जण ठार

T20 World Cup : बांगलादेशने T20 विश्वचषक 2024 साठी संघ जाहीर केला

IPL 2024 मध्ये एक नवा विक्रम रचला,पहिल्यांदाच इतके षटकार लागले

CAA: CAA अंतर्गत 14 लोकांना दिले नागरिकत्व प्रमाणपत्र,गृह मंत्रालयाची माहिती

लोकसभा निवडणूक 2024:उद्धव ठाकरेंना मानसोपचारतज्ज्ञाची गरज असल्याचे म्हणत फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ला

अफगाणिस्तानच्या पूरग्रस्तांसाठी कतारने मदत सामग्री पाठवली

दिंडोरी सभेत पंतप्रधान मोदींनी केला राष्ट्रवादी आणि शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा दावा

15 वर्षांच्या मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, प्रेयसीसाठी पत्नीला सोडले होते

पुढील लेख
Show comments