Festival Posters

अजित पवारांना पीएम मोदींची 'एक है तो सेफ है' ही घोषणा आवडली,'बटेंगे तो कटेंगे' घोषणेला विरोध

Webdunia
बुधवार, 13 नोव्हेंबर 2024 (17:30 IST)
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'एक है तो सेफ है' घोषणेचे समर्थन केले, परंतु योगी आदित्यनाथ यांच्या 'बटेंगे तो कटेंगे' घोषणेला विरोध केला आणि त्याला महाराष्ट्राच्या वैचारिक वारशापेक्षा वेगळे म्हटले

आपला पुतण्या आणि आता प्रतिस्पर्धी उमेदवार युगेंद्र पवार यांना राजकारणात रस नाही, बारामतीत राहणेही आवडत नाही, असा दावाही त्यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेला समर्थन दिले आणि म्हणाले, भारत एकत्र राहिला तरच सुरक्षित राहिल.या घोषणा मध्ये काही चुकीचे नाही आपण एकत्र राहिलो तर सर्वांची प्रगती होईल. मात्र योगी आदित्यनाथ यांची घोषणा बटेंगे तो कटेंगे चुकीची आहे.आम्ही त्याला समर्थन देत नाही.उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेशात लोकांची विचारसरणी वेगळी आहे, पण अशी विधाने इथे चालत नाहीत. माझ्या मते अशा शब्दांच्या वापराला महाराष्ट्रात काहीच महत्त्व नाही.
 
पवार म्हणाले की, महाराष्ट्र हे छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले आणि शिवाजी महाराजांचे राज्य आहे. महाराष्ट्रातील लोक वेगळे आहेत आणि त्यांचा विचार वेगळा आहे. छत्रपती शाहू महाराज, छत्रपती  शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, बाबा साहेब आंबेडकर यांची विचारधारा कोणी सोडली तरी महाराष्ट्र त्यांना सोडणार नाही. असे ते म्हणाले. 
Edited By - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

"मला मुख्यमंत्र्यांची दया येते," उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांवर निशाणा साधला

LIVE: उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर मंत्रिमंडळातील "भ्रष्ट" सहकाऱ्यांना संरक्षण देण्याचा आरोप केला

पैसे दुप्पट करण्यासाठी तीन जणांनी जीव गमावला! तांत्रिक विधीदरम्यान झालेल्या गूढ मृत्यूंमुळे खळबळ

नाशिकमध्ये भीषण आग! दुकाने जळून खाक

अमित शाह आणि मोहन भागवत अंदमान आणि निकोबारला भेट देणार, सावरकरांच्या पुतळ्याचे अनावरण होणार

पुढील लेख
Show comments