Dharma Sangrah

मनसे विधानसभा निवडणूक लढवणार

Webdunia
सोमवार, 30 सप्टेंबर 2019 (13:43 IST)
महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही विधानसभेची निवडणूक लढवणार, अशी घोषणा अखेर राज ठाकरे यांनी केली आहे.
 
5 ऑक्टोबर रोजी पक्षाची पहिली प्रचारसभा होणार, असंही त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.
 
पक्षाची ताकद विधानसभेत दाखवणार, असं बोलून राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुका न लढवण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र त्यांनी त्यावेळी तत्कालीन भाजप अध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध केलेल्या कॉर्पोरेट-स्टाईल प्रचारसभांमुळे राज चर्चेत आले होते.
 
पण एकीकडे भाजप आणि शिवसेना यांच्या विधानसभेसाठीच्या प्रचारयात्रा सुरू असताना दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीही आपापल्या जागावाटपाची चर्चा करत होते. मात्र या सर्व गडबडीत मनसेच्या तंबूत शांतता असल्याने, राज ठाकरे हे लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणूक लढवणार नाही का, असे प्रश्न विचारले जाऊ लागले होते.
 
त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या एका ताज्या विधानानं नव्या चर्चेला उधाण आलं होतं. पवार यांनी नुकतंच नाशिकमध्ये माध्यमांशी बोलताना म्हटलं की, "निवडणुकीवर बहिष्कार टाकावा, अशी राज ठाकरेंची भूमिका मांडली होती. पण आम्ही ती भूमिका मान्य नाही."
 
त्यामुळे राज ठाकरेंच्या निवडणूक मोहिमेचं नारळ फुटणार की नाही, याबाबत मनसेच्या कार्यकर्त्यांमध्येही संभ्रम होता.
 
मात्र यंदा निवडणुकांना अवघे तीन आठवडे उरले असताना राज यांनी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं. त्यातच एका आठवड्याने, म्हणजेच 5 ऑक्टोबरला पक्षाची पहिली सभा होणार आहे.
 
काही दिवसांपूर्वी मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी मनसे नाशिकमध्ये सर्व 13 मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवण्याची तयारी करत असल्याचं सांगितलं होतं. "मात्र अंतिम निर्णय हा राजसाहेब घेतील," असं ते त्यावेळी म्हणाले होते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

सरकारचा मोठा निर्णय मनरेगाचे नाव बदलून 'पूज्य बापू ग्रामीण रोजगार योजना' केले

महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेअंतर्गत ₹165 कोटींचा घोटाळा, सरकारी कर्मचाऱ्यांकडून वसुली सुरू

वैभव सूर्यवंशीच्या शानदार फलंदाजीमुळे भारताने 19 वर्षांखालील आशिया कपच्या पहिल्या सामन्यात युएईला हरवले

अर्शदीपने भारतीय गोलंदाज म्हणून 7 वाईडसह सर्वात लांब षटक टाकले

आशियातील सर्वात मोठे जीसीसी मुंबईत बांधले जाणार, ब्रुकफील्ड 1 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार

पुढील लेख
Show comments