rashifal-2026

मुख्यमंत्री शिंदे लबाड नाही ; मनोज जरांगेंना संभाजी भिडेंनी काय सांगितलं?

Webdunia
बुधवार, 13 सप्टेंबर 2023 (08:21 IST)
जालन्यातील अंतरवाली गावात गेल्या १५ दिवसांपासून मराठ्यांना आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे हे उपोषणाला बसले आहेत. जोपर्यंत मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळणार नाही, तोपर्यंत तसूभरही मागे हटणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. दुसरीकडे सरकारकडून जरांगे यांची मनधरणी सुरू आहे. आज राज्य सरकारचं एक शिष्टमंडळ जरांगे यांची भेट घेण्यासाठी जालन्यात दाखल झालं.
 
या शिष्टमंडळात मंत्री संदीपान भुमरे आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्यासह संभाजी भिडे देखील आहेत. यावेळी संभाजी भिडे यांनी आम्ही मराठा आरक्षणाचा समस्या संपेपर्यंत तुमच्यासोबत आहे, तुम्ही मागे वळून पाहायचं नाही. जसे पाहिजे तसे मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांना पाठींबा दिला.
 
राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लबाड नाहीत. देवेंद्र फडणवीसांच्या अंगी लुच्चेपणा नाही, उपमुख्यमंत्री अजित पवार जरी राष्ट्रवादीचे असतील, तरी कायदेशीर माणूस आहेत, माझं असं मत आहे की, तुम्ही उपोषण थांबवावं, अशी विनंती संभाजी भिडे यांनी मनोज जरांगे पाटील यांना केली आहे. त्याचबरोबर राजकारणी जो शब्द देतील, तो शब्द पाळून घ्याचं काम माझं आहे, मराठ्यांना आरक्षण नक्कीच मिळेल, असा विश्वासही मनोज जरांगे पाटील यांना दिला. दरम्यान, संभाजी भिडे यांच्या विनंतीनंतर मनोज जरांगे उपोषण मागे घेण्याबाबत नेमकी काय भूमिका घेणार? हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

मुंबईहून उत्तर प्रदेश-बिहार मार्गावर नवीन गाड्या सुरू करण्याची मागणी; काँग्रेस नेत्याने रेल्वेमंत्र्यांना पत्र लिहले

सासरी पोहोचल्यानंतर चार तासांत वधूचा पळून जाण्याचा प्रयत्न; चौकशीत 'बनावट लग्न' करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

LIVE: महाराष्ट्रात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ६५ वसतिगृहे उघडली

सरकारी विद्यापीठे आरएसएस ताब्यात घेत आहे! रोहित पवारांच्या आरोपांमुळे महाराष्ट्रात राजकीय खळबळ

लाडकी बहीण योजनेत घोटाळा! आता महाराष्ट्र सरकार पैसे वसूल करेल; मंत्री अदिती ताटकरेंचा इशारा

पुढील लेख
Show comments