Festival Posters

मागासवर्गीय आयोगाचे सदस्य अँटी मराठा, जातीयवादी

Webdunia
बुधवार, 13 डिसेंबर 2023 (08:13 IST)
छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणासाठी राज्यात अनेक पातळ्यांवर काम सुरू होते. मागासवर्गीय आयोगाने आपले काम सुरू केले होते. परंतु राज्य मागासवर्ग आयोगाच्या तीन सदस्यांनी राजीनामे दिले. त्यानंतर आता अध्यक्ष माजी न्यायमूर्ती आनंद निरगुडे यांनी राजीनामा दिला आहे. या राजीनामा सत्रावर मराठा आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब सराटे यांनी जोरदार हल्ला चढवला आहे.
 
त्यांनी मागासवर्गीय आयोगाचे राजीनामा देणारे सदस्य हे जातीयवादी आहेत. अँटी मराठा असल्याचा आरोप केला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी हे सर्व जण राजीनामे देत आहेत. हे सगळे सदस्य महाविकास आघाडी सरकारच्या काळात नेमलेले आहेत. आता सरकार बदलल्यामुळे त्यांनी राजीनामे दिल्याचे सराटे यांनी म्हटले.
 
बालाजी किल्लारीकर यांनी १ डिसेंबर रोजी राजीनामा दिल्यानंतर २ डिसेंबर रोजी हाके यांनीही राजीनामा दिला. आयोगाचे सदस्य सोनवणे यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर आता आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती आनंद निरगुडे यांनी राजीनामा दिल्याचे मंगळवारी समोर आले.
 
क्युरेटिव्ह पिटीशन हा वेळकाढूपणा
मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह पिटीशन दाखल केली आहे. ही क्युरेटिव्ह पिटीशन म्हणजे वेळकाढूपणा आहे. क्युरेटिव्ह पिटीशन हा विषय संपलेला आहे. मराठा समाजाच्या ९० टक्के नोंदी सापडल्या आहेत. समाजाला आरक्षण मिळत आहे. क्युरेटिव्ह पिटीशन म्हणजे निवळ वेळ वाया घालवण्याचा प्रकार आहे, असे बाळासाहेब सराटे यांनी म्हटले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

सोलापूरमध्ये हॉटेलच्या खोलीत रील स्टार रोहिणी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली

LIVE: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा झाला

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा झाला; ३० जूनपूर्वी २ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाची माफी दिली जाणार

नाशिक जिल्ह्यातील काश्यपी धरणात जोडपे आणि दोन किशोरवयीन मुलांचा बुडून मृत्यू

वर्ध्यात पाण्याच्या टाकीत पडून २ वर्षांच्या मुलीचा मृत्यू

पुढील लेख
Show comments