Dharma Sangrah

मराठा आरक्षण मिळेपर्यंत आमदार, मंत्री आणि खासदार यांना गावात नो ‘एन्ट्री’ ! नाशिक जिल्ह्यात दीडशेपेक्षा जास्त गावांचा निर्णय

Webdunia
बुधवार, 25 ऑक्टोबर 2023 (21:10 IST)
नाशिक : राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न अजेंड्यावर आला आहे. मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावे अशी मागणी केली.
 
अशातच मराठा समाजाच्या आरक्षणासाठी समाज आक्रमक झाला असून जोपर्यंत सरकार मराठा समाजाला आरक्षण देत नाही, तोपर्यंत राज्यातील अनेक गावात राजकीय पुढारी, नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील सुमारे १५० हुन अधिक गावांमध्ये नेत्यांना गावबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 
मराठा बांधव कुणबीचे आरक्षण  काही शरद पवार, नारायण राणे आणि रामदास कदम यांच्या नातवांसाठी मागत नसून तो गरजवंत मराठा समाजासाठी मागत असल्याचं म्हणत नाशिक जिल्ह्यातील सकल मराठा समाज आक्रमक झाला. मराठा आरक्षणासाठी साठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाला बळ देण्यासाठी आता लोकप्रतिनिधीना गावबंदी केली जातेय. नाशिक जिल्ह्यातील १५० हुन अधिक गावांनी गावबंदीचा निर्णय घेतला.
 
गावागावात गावबंदीचे फलक लावले जात असून आमदार, खासदार यांना गावात फिरू दिलं जाणार नाही. याशिवाय सकल मराठा समाज गावागावात जाऊन जनजागृती करत हे आंदोलन अधिक आक्रमक करणार आहे. यावेळी मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या मराठा नेत्यांच्याही विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आलीय.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

हार्दिक पांड्या - माहिका रिलेशनशिप कन्फर्म

LIVE: आमदार थेट बिबट्याच्या वेशात अधिवेशनाला

पुण्यातील हडपसर येथे एका रुग्णाच्या मृत्यूनंतर संतप्त कुटुंबीयांनी रुग्णालयाच्या खिडक्या फोडल्या

मार्च 2026 मध्ये भारत पहिल्या राष्ट्रकुल खो खो स्पर्धेचे आयोजन करेल

सुरतच्या कापड बाजारात भीषण आग लागली, ज्यामुळे अनेक दुकाने जळून खाक

पुढील लेख
Show comments