Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जरांगेंच्या दौऱ्याचा चौथा टप्पा आजपासून सुरु, जालनात होणार भव्यसभा

Webdunia
शुक्रवार, 1 डिसेंबर 2023 (16:25 IST)
मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. मनोज जरांगे पाटील यांचा महाराष्ट्र दौरा सध्या सुरू असून मनोज जरांगे यांचा चौथा टप्पा आजपासून सुरु झाला असून आज 1 डिसेंबर रोजी त्यांची भव्यसभा जालनात होणार आहे. जालनाच्या मोंढा परिसरात त्यांचं जंगी भाषण होणार आहे. 40 एकराच्या या मैदानावर जरांगे पाटीलांची भव्य सभा होणार असून या भाषणाला गर्दी होण्याची शक्यता आहे.

पार्किंगसाठी 100 एकर जागेवर सोय करण्यात आली आहे. मनोज जरांगे पाटीलांच्या चौथ्या टप्प्यात नांदेड येथे सभा होणार, या दौऱ्यात त्यांच्या एकूण तीन सभा होणार आहे. या दौऱ्यातील सर्वात मोठी सभा वाडीपाटी येथे होणार असून 111 एकरच्या मोठ्या मैदानात ही सभा होणार आहे. 
 
मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषणाला बसले होते. ओबीसी हे प्रवर्गात समाविष्ट करण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. या मागणीला ओबीसींचे नेते छगन भुजबळ यांचा विरोध आहे. या मुळे भुजबळ आणि जरांगे पाटीलांमध्ये वाद सुरु आहे. दोघे एकमेकांवर टीका करत आहे. जरांगे पाटीलांनी भुजबळ यांच्यावर सभेतून हल्ला बोल केला तर.  भुजबळ यांनी ओबीसीची सभा घेत जरांगे पाटीलांना सडेतोड उत्तर दिले. आज जालन्यात होणाऱ्या सभेत जरांगे पाटील काय बोलणार या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जरांगे पाटील यांचा दौऱ्याचा पाचवा टप्पा कोकणात असणार. 
 
Edited by - Priya Dixit 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पिण्याच्या पाण्याच्या बाटलीमध्ये कमोडच्या सीटपेक्षा जास्त जंतू असतात? संशोधक काय इशारा देतात? वाचा

शिंदे सरकारने स्पर्धा परीक्षांमधील अनियमितता रोखण्यासाठी विधानसभेत विधेयक मंजूर केले

भाजपने 24 राज्यांचे प्रभारी आणि सहप्रभारी घोषित केले जावडेकरांसह या नेत्यांवर मोठी जबाबदारी

Road Accident : पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर तीन वाहनांचा भीषण अपघात, एक ठार

कार्ला -मळवली पुलावरून एक जण वाहून गेला, शोधण्याचे कार्य सुरु

सर्व पहा

नवीन

अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी,17 जुलै रोजी सुनावणी

केरळमध्ये 'मेंदू खाणाऱ्या' अमिबा संसर्गामुळे मुलाचा मृत्यू

Brain Eating Amoeba ने घेतला 14 वर्षाच्या मुलाचा जीव, जाणून घ्या किती धोकादायक आहे

1 रुपयात पीक विमा योजनेसाठी अर्ज करताय? मग आधी या 5 गोष्टी लक्षात ठेवा

मुलींना लहान वयातच पाळी येणं धोकादायक का आहे? त्याची कारणं काय आहेत?

पुढील लेख
Show comments