suvichar

तर आपलं दुसरं सामाजिक पानिपत होईल : शिवेंद्र राजे

Webdunia
मंगळवार, 3 नोव्हेंबर 2020 (08:40 IST)
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिली. त्यामुळे मराठा तरुणांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे राज्य सरकारने या प्रश्नावर तातडीने तोडगा काढला पाहिजे नाहीतर इतिहासात मराठ्यांचे पानिपत झालं असं बोललं जातं आता आपण एकत्र आलो नाही तर आपलं दुसरं सामाजिक पानिपत होईल असंही शिवेंद्रराजेंनी म्हटलं आहे.साताऱ्यात मराठा समाजाची गोलमेज परिषद सुरु आहे या परिषदेला संबोधित करताना शिवेंद्रराजेंनी ही भूमिका मांडली. 
 
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मराठा तरुण-तरुणींमध्ये नाराजी आहे. त्यामुळे राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा निर्णय लवकरात लवकर घेणं गरजेचं आहे असं सांगत असतानाच राज्य सरकारने एमपीएसीच्या मेगा भरतीसह इतर विषयांमध्ये गडबड करु नये असंही शिवेंद्रराजेंनी म्हटलं आहे.
 
मराठा आरक्षणासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढलं पाहिजे. त्याची गरज आहे. वेगवेगळे लढण्याची चूक कुणीही करु नये. आपण वेगळे लढलो तर इतिहासाची पुनरावृत्ती होऊ शकते असंही शिवेंद्रराजेंनी म्हटलं आहे. मराठा समाज कधीही एकत्र येत नाही असं बोललं जातं. मराठा समाजात दुफळी असल्याचंही बोललं जातं. त्यामुळे सर्वांनी एकत्र आलं पाहिजे असंही शिवेंद्रराजेंनी म्हटलं आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

जनगणनाच्या ३३ प्रश्नांमधून ओबीसी रकाना वगळल्याबद्दल राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा दिल्लीत आंदोलनाचा इशारा

Maruti Suzuki Cars Price Hike: कार खरेदी करायचीये? मग १ जूनआधीच घ्या निर्णय; ३० हजारांनी वाढणार किमती!

महाराष्ट्रातील गोतस्करांची आता खैर नाही; MCOCA अंतर्गत गुन्हा दाखल केला जाणार

LIVE: भाजप आमदार प्रसाद लाड यांची जरांगे यांच्याशी भेट

भाजप आमदार प्रसाद लाड यांची जरांगे यांच्याशी भेट, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर विशेष आवाहन

पुढील लेख
Show comments