Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बँक दररोज आपल्या खात्यात टाकेल 100 रुपये, जाणून घ्या RBI चा नियम

Webdunia
वर्तमानात देखील बँक ग्राहकांना अनेक प्रकाराच्या समस्यांना सामोरं जावं लागतं. बँकेद्वारे सतत केले जात असलेल्या प्रयत्नांनंतर देखील ग्राहकांना अनेक प्रश्न पडतात. अनेकदा ग्राहक एटीएमहून पैसे काढण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्याच्या खात्यातून पैसे तर निघून जातात परंतू एटीएमहून कॅश मिळत नाही. आपल्यासोबत देखील असे घडत असेल तर भारतीय रिझर्व बँक (आरबीआय) द्वारे तयार हा नियम आपल्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. 
 
आरबीआयने असे प्रकरण सोडवण्यासाठी एक नियम काढला आहे. या नियमानुसार आपली रक्कम खात्यात येत नाही तोपर्यंत बँकेला आपल्याला दररोज भरपाई म्हणून 100 रुपये अतिरिक्त द्यावे लागतील. 
 
आरबीआयने या संदर्भात एक वेळ मर्यादा निर्धारित केलेली आहे. मे 2011 मध्ये आरबीआयकडून जारी निर्देशानुसार, अशी तक्रार मिळत्याक्षणापासून सात दिवसात बँकेला रक्कम ग्राहकाच्या खात्यात वापस टाकवी लागेल.
 
बँकेकडून पेनल्टी मिळवण्यासाठी आपल्याला ट्रांजेक्शन फेल झाल्याच्या 30 दिवसात ट्रांजेक्शन पर्ची किंवा अकाउंट स्टेटमेंट सह तक्रार नोंदवावी लागेल. यानंतर आपल्याला बँकेच्या अधिकृत कर्मचार्‍याला आपल्या एटीएम कार्डची माहिती द्यावी लागेल. सात दिवसात पैसा परत आला नाही तर आपल्याला एक फॉर्म भरावा लागेल, फॉर्म भरल्यावर आपली पेनल्टी सुरू होऊन जाईल.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments