Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Lockdown दरम्यान LIC चे ग्राहक फेक कॉल्सपासून राहा सावध

Webdunia
सोमवार, 11 मे 2020 (11:14 IST)
भारतीय जीवन विमा महामंडळ म्हणजेच LIC सर्वात विश्वासार्ह्य आणि सुरक्षित मानले जाते. विमाच्या बाजारपेठेत ह्याचे सर्वात जास्त ग्राहक आहेत. यामध्ये आपले पैसे सुरक्षित राहतातच याच बरोबर आपल्याला काही पॉलिसीवर चांगले रिटर्न सुद्धा मिळतात. 
 
सध्या सर्वत्र कोरोनाने थैमान घातले असून या लॉक डाऊनच्या काळात बनावटी कॉल करून फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. 
 
एलआयसीच्या ग्राहकांना अजून सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. एलआयसीने आपल्या ग्राहकांना अश्या बनावटी कॉल पासून सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. त्यांनी ग्राहकांना सतर्क आणि जागरूक राहण्यास सांगितले आहे. एलआयसी ने आपल्या ग्राहकांसाठी या फसवणुकी पासून वाचण्यासाठी काही टिप्स दिल्या आहे. 
 
कंपनीने सल्ला दिला आहे : कंपनीने आपल्या ग्राहकांना पॉलिसी बद्दल चुकीची माहिती देऊन ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या अश्या फसवी कॉल पासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. तसेच एलआयसीचे अधिकारी बनून किंवा आयआरडीएय (IRDAI ) अधिकाऱ्यांच्या नावाने लोकांना आपल्या जाळत अडकवतात. अलीकडल्या काळात विमा रक्कम तातडीने मिळणाऱ्याच्या नावाखाली फसवणूक होण्याचे प्रकार दृष्टीस आले आहे. 
 
ही खबरदारी ठेवावी : 
कंपनीच्या म्हणण्यानुसार अश्या कोणत्याही कॉलवर जास्त बोलू नका जे आपल्याला पॉलिसी बद्दलची माहिती मागत असतील. फोन करणारा आपल्याला आपली पॉलिसी सरेंडर करण्याबाबत किंवा जास्त नफा मिळवून देण्याबाबत माहीती देत असल्यास त्वरित फोन बंद करावा. त्याचा बोलण्यावर विश्वास ठेवू नये. आपल्या कोणत्याही पॉलिसी संदर्भात खासगी माहिती देऊ नये. 
 
त्वरित हे करावे : 
पॉलिसीच्या संदर्भात काहीही माहिती मिळवायची असल्यास LIC च्या संकेत स्थळावर www.licindia.in 
यावर भेट द्या. किंवा एलआयसीच्या अधिकृत शाखेशी संपर्क साधावा. आपल्या फोन कॉल सह पूर्ण तपशील नजीकच्या पोलीस ठाण्यात नोंद करता येईल. या शिवाय आपण आपली तक्रार spuriouscalls@licindia.com या संकेत स्थळावर सुद्धा करू शकता.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

महाकुंभ : प्रचंड गर्दीमुळे संगम रेल्वे स्टेशन २८ फेब्रुवारीपर्यंत बंद

कामगार संघटनेच्या कार्यकर्त्याची चाकूने वार करून हत्या, तीन संशयित ताब्यात

LIVE: मला फक्त दोन तासांसाठी ईडीची कमान द्या,संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

लातूर मध्ये वेगवान एसयूव्ही हॉटेलात शिरली, एकाचा मृत्यू, चार जखमी

बेकायदेशीर कोळसा खाण कोसळल्याने पती-पत्नीचा वेदनादायक मृत्यू

पुढील लेख
Show comments