Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बाबा रामदेव यांना पुन्हा धक्का! पतंजलीची सोनपापडी गुणवत्ता चाचणीत फेल!

Webdunia
रविवार, 19 मे 2024 (12:42 IST)
बाबा रामदेव पुन्हा अडचणीत सापडले असून पतंजलीवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता  चाचणीत फेल झाली आहे.या प्रकरणी कारवाई करत, उत्तराखंडच्या पिथौरागढच्या पोलिसांनी  तिघांना अटक केली असून या मध्ये पतंजलीच्या सहाय्यक व्यवस्थापकाचाही समावेश आहे.
 
तिघांनाही सहा महिन्यांची शिक्षा आणि दंडही ठोठावण्यात आला आहे. अन्न सुरक्षा आणि मानक कायदा 2006 च्या कलम 59 अंतर्गत ही शिक्षा ठोठावण्यात आली आहे. सहाय्यक व्यवस्थापकाला 50 हजार रुपये तर अन्य दोन दोषींना 10 आणि 25 हजार रुपये दंड भरावा लागणार आहे.
 
वृत्तानुसार, 17 ऑक्टोबर 2019 रोजी जिल्हा अन्न सुरक्षा अधिकाऱ्याने उत्तराखंडमधील पिथौरागढ बेरीनाग मार्केटला भेट दिली. यावेळी बेरीनाग मार्केटमध्ये असलेल्या लीलाधर पाठक यांच्या दुकानावर छापा टाकण्यात आला.
 
सोन पापडीचे नमुने घेऊन रुद्रपूर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले. तसेच रामनगर कान्हा जी आणि पतंजली या पुरवठादारांना नोटीस बजावण्यात आली आहे.
 
तपासणीत मिठाईचा दर्जा निकृष्ट असल्याचे आढळून आले. चाचणीत नापास झाल्याने पोलिसांनी कारवाई करत तिघांना अटक केली असून तिघांविरुद्धची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर काल त्यांना तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.
 
Edited by - Priya Dixit 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

टीम इंडियाच्या स्वागतासाठी एका दिवसात, 2.2 किमी अंतराच्या रस्त्यावर परेड करणं योग्य होतं?

मुलींना लहान वयातच पाळी येणं धोकादायक का आहे? त्याची कारणं काय आहेत?

हाथरस दुर्घटना : अनेक बळी जाऊनही गुरुंबद्दल अनुयायी प्रश्न का उपस्थित करत नाहीत?

सुप्रिया सुळेंकडून ‘लाडकी बहीण’ योजनेची प्रशंसा, म्हणाल्या- बेरोजगारी आणि महागाई पाहता योजना चांगली आहे

सट्टेबाजी ऍप प्रकरणामध्ये छत्तीसगढ पोलिसांची मोठी कारवाई, महाराष्ट्र मधून 5 जणांना घेतले ताब्यात

सर्व पहा

नवीन

वृद्ध घरमालकाची घृणास्पद कृती, विद्यार्थिनींचा विनयभंग

चंद्रपुरात मनसे जिल्हाध्यक्षावर गोळ्या झाडल्या, परिसरात खळबळ उडाली

मोदींनी करोडो लोकांना आळशी बनवले, मोफत धान्य देणे म्हणजे विकास नाही, ठाकरे गटाचा पंतप्रधानांवर हल्लाबोल

कोटा मध्ये आत्महत्येचा आकडा 14, JEE ची तयारी करण्याऱ्या विद्यार्थ्यांची आत्महत्या

आसाम-मणिपुर मध्ये पुरामुळे हाहाकार, 56 जणांचा मृत्यू, 21 लाख लोक प्रभावित, शाळा-कॉलेज बंद

पुढील लेख
Show comments