Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

काय म्हणता देशात केवळ ५ सरकारी बँका राहणार

Webdunia
मंगळवार, 21 जुलै 2020 (16:43 IST)
येत्या काळात देशात केवळ ५ सरकारी बँका ठेवण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. इतर बँकांचे खासगीकरण करण्यात येणार आहे. बँकिंग उद्योगाची स्थिती सुधारण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
 
कोरोनामुळे देशाची अर्थव्यवस्था मंदावली आहे. त्यामुळे देशात पाचपेक्षा जास्त सरकारी बँका असू नयेत, असे काही सरकारी समित्या आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया(RBI)ने सरकारला असे सुचवले आहे. याच वर्षी १० सरकारी बँकांचे विलीनीकरण ४ राष्ट्रीयकृत बँकांमध्ये करण्यात आले. मात्र, आता सरकारी बँकांचे विलीनीकरण शक्य नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत सरकारकडे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये आपला हिस्सा विकण्याशिवाय पर्याय राहिला नाही. त्यामुळे सरकारने बँकांचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.
 
सरकारची ही खासगीकरणाची योजना प्रत्यक्षात आल्यास देशात केवळ ५  सरकारी बँका राहतील. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात बँक ऑफ इंडिया (BOI), सेंट्रल बँक ऑफ इंडिया (CBI), इंडियन ओव्हरसीज बँक (IOB), यूको बँक (UCO Bank), बँक ऑफ महाराष्ट्र आणि पंजाब अँड सिंध बँकेचा बहुसंख्य हिस्सा विकण्याचा सरकारचा विचार आहे.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments