Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बातमी उपयोगाची, SBI ने नियमामध्ये केले आहेत असे बदल

Webdunia
गुरूवार, 20 ऑगस्ट 2020 (10:39 IST)
या आठवड्यात SBIने आपल्या नियमांमध्ये बरेच बदल केले आहेत. हे नियम एटीएम व्यवहार, किमान शिल्लक आणि एसएमएस शुल्काबाबत आहेत. या नियमांमध्ये बँकेने कोणते बदल केले आहेत ते पाहू ...
 
१) स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) १ जुलैपासून एटीएम मधून पैसे काढण्याचे नियम बदलले आहेत. जर हे नियम पाळले नाहीत तर ग्राहकांना दंड आकारला जाईल. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध माहितीनुसार SBI मेट्रो शहरांमधील नियमित बचत खातेधारकांना (सेव्हिंग खातेधारकांना) एटीएममधून एका महिन्यात ८ विनामूल्य व्यवहार करण्याची परवानगी देते. विनामूल्य व्यवहार मर्यादा ओलांडल्यानंतर प्रत्येक व्यवहारावर ग्राहकांकडून शुल्क आकारले जाईल.
 
२) SBI ने १८ ऑगस्ट रोजी ग्राहकांना एक मोठी भेट दिली असून आता बचत खातेधारकांकडून एसएमएस शुल्क बँक घेणार नाही.
 
३) SBI ने एटीएममधून दहा हजार रुपयांहून अधिक रोख रक्कम काढण्याच्या नियमातही बदल केला आहे. आता जर तुम्ही SBI एटीएममधून १० हजार रुपयांहून अधिक पैसे काढले तर तुम्हाला ओटीपीची आवश्यकता असेल. बँकेच्या या सुविधेअंतर्गत खातेदारांना SBI च्या एटीएममधून सकाळी ८ ते सकाळी ८ या वेळेत रोकड काढण्यासाठी ओटीपीची आवश्यकता असेल. बँकेची ही सुविधा केवळ खातेदारांना एसबीआय एटीएममध्ये उपलब्ध असेल. आपण इतर कोणत्याही एटीएममधून रोकड काढल्यास आपण ते पूर्वीसारखे सहज काढू शकता. आपल्याला कोणत्याही ओटीपीची आवश्यकता नाही.
 
४) एसबीआय बचत खातेधारकांकडून किमान मासिक रक्कम ठेवत नसल्यासही शुल्क आकारणार नाही आहे. एसबीआयच्या ४४ कोटीहून अधिक बचत खातेधारकांना ही सुविधा मिळेल. यावर्षी मार्चमध्ये SBI ने जाहीर केले की सर्व बचत बँक खात्यांसाठी आवश्यक मासिक किमान शिल्लक ठेवणे अनिवार्य नसणार आहे. याद्वारे बँकेच्या सर्व बचत खातेदारांना शून्य शिल्लक सुविधा मिळू शकेल. याआधी मेट्रो शहरांमधील बचत खातेधारकांना किमान रक्कम म्हणून ३००० रुपये, शहरांमध्ये २००० रुपये आणि ग्रामीण भागात १००० रुपये ठेवणे आवश्यक होते.

संबंधित माहिती

महिला PSI ने केस बंद करण्यासाठी लाच मध्ये मागितला मोबाईल, नकली फोन घेऊन पोहचले ACB ऑफिसर

मी घाबरत नाही, नवनीत राणा म्हणाल्या जो कोणी पाकिस्तानसाठी काम करतो त्याला मी उत्तर देईन

शिवसेना(युबीटी)च्या रॅलीमध्ये होता1993 चा मुंबई बॉंम्ब स्फोटचा आरोपी, भाजपचा मोठा आरोप

मणिशंकर अय्यरचे पाकिस्तान प्रेम, लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसमध्ये वाढली समस्या

निवडणूक महत्वाचे काम आहे तर कायद्याचे पालन होणार नाही का? मुंबई हाय कोर्टाचा निवडणूक आयोगाला प्रश्न

Gold-Silver Price Update: अक्षय्य तृतीयापूर्वी सोनं झालं स्वस्त!

Russia-ukraine war : रशिया-युक्रेन संघर्षात श्रीलंकेच्या आठ सैनिकांचा मृत्यू

उपांत्यपूर्व फेरीत मनिका बत्रा जपानच्या हिना हयाता कडून पराभूत

IND W vs BAN W: भारतीय महिला संघाने बांगलादेशचा पाचव्या सामन्यात 21 धावांनी पराभव केला

Air India : एअर इंडिया एक्सप्रेसच्या केबिन क्रूने संप मागे घेतला

पुढील लेख
Show comments