Dharma Sangrah

ATMच्या नियमात बदल, रात्री 9 नंतर पैसे भरता येणार नाही

Webdunia
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018 (08:57 IST)
सरकारने ATMशी संबंधित नियम बदलले आहेत. या नियमांतर्गत रात्री 9 वाजल्यानंतर ATMमध्ये पैसे भरता येणार नाहीत. कॅशव्हॅनमधून एकाच वेळी 5 कोटींहून अधिक रक्कम घेऊन जाता येणार नाही. त्याप्रमाणेच कॅशव्हॅनची सुरक्षा करणा-या कर्मचा-यांना चोरांपासून बचाव करण्याचं संरक्षणही दिलं जाणार आहे. ग्रामीण भागासाठी प्रायोगिक तत्त्वावर हे नवे नियम लागू करण्यात आले आहेत. गृहमंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या सूचनेनुसार, पैशांची वाहतूक करण्यासाठी कार्यरत असलेल्या सुरक्षारक्षकांना त्यांच्या आधारची पडताळणी करून घ्यावी लागणार आहे. ग्रामीण भागात संध्याकाळी 6 वाजल्यानंतर ATMमध्ये कॅश भरण्यात येणार नाही.
 
सर्व कॅशव्हॅनमध्ये GSMवर आधारित ऑटो डायलर, सिक्युरिटी अलार्म आणि मोटराइज्ड सायरन बसवण्यात येणार आहेत. कॅशव्हॅनमध्ये सीसीटीव्ही, लाइव्ह जीपीएस ट्रॅकिंग सिस्टीम आणि बंदुकांसह सिक्युरिटी गार्ड तैनात राहणार आहेत. सिक्युरिटी गार्डच्या बंदुकीतून दोन वर्षांतून कमीत कमी एकदा टेस्ट फायरिंग केली जाणार आहे. तसेच बुलेट प्रत्येक दोन वर्षांनी बदलण्यात येणार आहे. CCTVच्या माध्यमातून चोरांवर नजर ठेवली जाणार आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

शेतकरी कर्जमाफी वर सरकार 1 जुलै पर्यंत योजना जाहीर करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधान

मुंबई महाराष्ट्राचीच राहिल, महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळेल -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

LIVE: महाराष्ट्र सरकार दहिसर आणि जुहू रडार स्टेशन हलवणार

देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हेडगेवार स्मारक मंदिरात पोहोचले, अजित पवारांनी अंतर ठेवले

ऑस्ट्रेलियातील बोंडी बीचवर गोळीबार,अनेकांचा मृत्यू, दोघांना अटक

पुढील लेख
Show comments