Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

EMI टाळण्यासाठी फोन कॉल किंवा मेसेज आल्यास सावध राहा, ओटीपी शेअर करू नका

Webdunia
मंगळवार, 7 एप्रिल 2020 (17:14 IST)
कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे लॉकडाऊनची परिस्थितीला बघून रिझर्व्ह बँकेने बँकेच्या कर्जधारकांना मोठा दिलासा देऊन त्यांना तीन महिन्याची ईएमआय पुढे ढकलण्याचा पर्याय दिला आहे. या दरम्यान काही सायबर ठग याचा फायदा घेऊन ग्राहकांना बँकेचे प्रतिनिधी म्हणून कॉल करीत आहे. त्यांना कर्जाची ईएमआय पुढे ढकलण्यासाठी ओटीपी मागत आहे. काही भोळेभाबडया लोकांकडून चुकून ओटीपी सांगितल्यावर त्यांचा खात्यातून सर्व पैसे काढले जात आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना या बाबत एक खबरदारी दिली आहे. 
 
एसबीआयने ट्विट करून म्हटले आहे, की सायबर फसवणूक करणारे लोकांना फसविण्याचे नवे नवे मार्ग शोधतात. फसवे ग्राहकांना कॉल करतात आणि त्यांचा कडून कर्जाची ईएमआय थांबविण्यासाठी ओटीपी सामायिक करण्याचे सांगत आहे. आपण तसे करू नका. आपले ओटीपी कोणाशीही सामायिक करू नका. असे केल्यास आपल्या खात्यामधून त्वरित पैसे काढून घेण्यात येतात. आपला ओटीपी कोणाशीही सामायिक करू नका. ईएमआयच्या योजनेबद्दलची योग्य माहिती मिळविण्यासाठी बँकांच्या साईट वर जाऊन तपशील करावा. 
 
एसबीआयच्या म्हणण्यानुसार ज्या ग्राहकांना त्यांचा कर्जाची ईएमआय ठेवायची असेल त्यांनी बँकेत या संदर्भात बँकेला ईमेल करून अर्ज करावयाचे असते. ज्यांना ईमेल करणे शक्य नसेल त्यांनी आपले अर्ज लिहून देऊ शकतात आणि बँकेच्या मुख्य शाखेत देऊ शकतात. अर्जाचे स्वरूप आणि एसबीआय ईमेल आयडी बद्दलची सर्व तपशील एसबीआयच्या संकेत स्थळावर https://bank.sbi/stopemi उपलब्ध आहे. त्याच वेळी 3 महिन्यांसाठी ईएमआय ठेवल्यास वास्तविक परतफेड कालावधीत अतिरिक्त तीन महिने त्यात जोडले जातील आणि ईएमआय स्थगितीच्या तीन महिन्यात, व्याज आकारले जाईल जे नंतर अतिरिक्त ईएमआय म्हणून द्यावे लागतील. ज्यांना ईएमआय होल्ड करायचा नसेल त्यांनी हे करण्याची आवश्यकता नाही. त्यांचा ईएमआय जसा होता तसाच कापला जाईल.

संबंधित माहिती

महिला PSI ने केस बंद करण्यासाठी लाच मध्ये मागितला मोबाईल, नकली फोन घेऊन पोहचले ACB ऑफिसर

मी घाबरत नाही, नवनीत राणा म्हणाल्या जो कोणी पाकिस्तानसाठी काम करतो त्याला मी उत्तर देईन

शिवसेना(युबीटी)च्या रॅलीमध्ये होता1993 चा मुंबई बॉंम्ब स्फोटचा आरोपी, भाजपचा मोठा आरोप

मणिशंकर अय्यरचे पाकिस्तान प्रेम, लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसमध्ये वाढली समस्या

निवडणूक महत्वाचे काम आहे तर कायद्याचे पालन होणार नाही का? मुंबई हाय कोर्टाचा निवडणूक आयोगाला प्रश्न

Gold-Silver Price Update: अक्षय्य तृतीयापूर्वी सोनं झालं स्वस्त!

Russia-ukraine war : रशिया-युक्रेन संघर्षात श्रीलंकेच्या आठ सैनिकांचा मृत्यू

उपांत्यपूर्व फेरीत मनिका बत्रा जपानच्या हिना हयाता कडून पराभूत

IND W vs BAN W: भारतीय महिला संघाने बांगलादेशचा पाचव्या सामन्यात 21 धावांनी पराभव केला

Air India : एअर इंडिया एक्सप्रेसच्या केबिन क्रूने संप मागे घेतला

पुढील लेख
Show comments