Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ड्रायफ्रूट्स महागले, तालिबानने थांबवला भारताशी व्यापार

Dried fruits became more expensive
Webdunia
गुरूवार, 19 ऑगस्ट 2021 (12:28 IST)
काबुलवर ताबा घेतल्यानंतर तालिबानने भारतातून सर्व आयात-निर्यात बंद केली आहे. फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन (FIEO) चे महासंचालक डॉ.अजय सहाय यांनी बुधवारी एएनआय या वृत्तसंस्थेशी केलेल्या संभाषणात ही माहिती दिली. ते म्हणाले की, तालिबानने पाकिस्तानच्या ट्रांजिट मार्गाने मालाची वाहतूक बंद केली आहे. यामुळे भारतातून मालाची वाहतूक देशात थांबली आहे.
 
त्यांनी म्हटले की “आम्ही अफगाणिस्तानमधील घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून आहोत. तेथून आयात पाकिस्तानच्या पारगमन मार्गाने होते. आता तालिबानने पाकिस्तानातून मालाची वाहतूक बंद केली आहे, त्यामुळे आयात जवळपास थांबली आहे.
 
भारत हा अफगाणिस्तानचा प्रमुख व्यापारी भागीदार आहे. आतापर्यंत, 2021 मध्ये नवी दिल्लीहून काबुलला 83.5 कोटी डॉलर्स (सुमारे 6262.5 कोटी रुपये) किंमतीच्या वस्तूंची निर्यात झाल्या आहेत.
 
त्याच वेळी, अफगाणिस्तानातून भारतात सुमारे 51 कोटी डॉलर (सुमारे 3825 कोटी रुपये) किंमतीच्या वस्तू आयात केल्या गेल्या आहेत. व्यापाराव्यतिरिक्त भारताने अफगाणिस्तानातही मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. भारताद्वारे देशात चालवल्या जाणाऱ्या 400 हून अधिक प्रकल्पांमध्ये तीन अब्ज डॉलर्स (सुमारे 225 अब्ज रुपये) ची गुंतवणूक असल्याचा अंदाज आहे.
 
अफगाणिस्तानमधील अस्थिर परिस्थितीमुळे येत्या काही दिवसांमध्ये सुक्या फळांच्या किमती वाढण्याची भीती फेडरेशन ऑफ इंडिया एक्सपोर्ट ऑर्गनायझेशनने व्यक्त केली आहे. भारत अफगाणिस्तानमधून सुमारे 85 टक्के सुका मेवा आयात करतो.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Breast Size स्तनांचा आकार वाढवण्यासाठी दररोज करा हे योगासन, आकर्षण वाढेल

२९ मार्च रोजी शनि कुंभ राशीत अस्त करणार, ३ राशींना अडचणींना सामोरे जावे लागेल!

Surya Grahan 2025 वर्षातील पहिले सूर्यग्रहण भारतात दिसेल का? सुतक काळ आणि त्याचा परिणाम जाणून घ्या

उन्हाळ्यात भाजी खरेदी करताना या गोष्टी ठेवा लक्षात

घराच्या दिशेनुसार कोणती झाडे लावावीत

सर्व पहा

नवीन

LIVE: नितीन गडकरींना शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव देशमुख पुरस्कार प्रदान

मुंबईतील व्यावसायिकाची ११.५ लाख रुपयांची फसवणूक, ४ जणांना अटक

२०१६ च्या हत्या प्रकरणात आरोपीला ठाणे जिल्ह्यातील एका न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली

ठाणे : अटकेपूर्वी जामिनासाठी बनावट कागदपत्रे सादर केल्याबद्दल गुन्हा दाखल

Nagpur violence: हिंसाचारात जखमी झालेल्या व्यक्तीचा रुग्णालयात मृत्यू

पुढील लेख
Show comments