Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईत कांदा आणि बटाट्याने गृहिणींच्या डोळ्यात आणले पाणी, वाढ्ले इतके भाव

Webdunia
गुरूवार, 22 ऑक्टोबर 2020 (16:09 IST)
महाराष्ट्रासह देशभरात परतीच्या पावसाने शेतकऱयांना फार  मोठा फटका बसला आहे. या सर्वांचा थेट फटका आता सर्वसामान्यांना बसतो आहे. यामध्ये  पिकांचे झालेले नुकसान लक्षात घेता आता भाज्यांचा दरात कमालीचे वाढ झाली आहे.  मात्र  कांद्याच्या दराने पुन्हा एकदा सर्वसामान्यांच्या आणि गृहिणींच्या  डोळ्यात पाणी आणले आहे.
मुंबईसह आसपासच्या बाजारात प्रती किलो कांद्याच्या दराने तब्ब्ल  शंभरी गाठली आहे. तर  बटाटा प्रति किलो 50 रुपयांच्या घरात पोहचला आहे.सोबत  इतर भाज्यांच्या किंमतीत ही प्रचंड वाढ झाली असून या भाज्यांचे प्रती किलो दर आता 60 ते 200 रुपयांपर्यंत पोहचल्याने सर्वसामान्यांची फार पंचाईत झाली आहे. ऐन सणासुदीच्या दिवसात ही दरवाढीची झळ सोसावी लागल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
 
मुंबईसह देशभरातील बाजारपेठांमध्ये सध्या ही परिस्थिती पहायला मिळत आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या दिवसांत सर्वसामान्यांना हात आखडता घ्यावा लागणार आहे. मुंबईसह देशभरातील बाजारपेठांमध्ये एका दिवसांत कांद्याची किंमत प्रती किलो 60 रुपयांवरुन थेट 100 रुपयांवर पोहचली आहे.त्यामुळे येणार काळ हा कांदा रडवणार आहे.

संबंधित माहिती

मुंबईत इमारतीच्या 40 फूट खोल सेप्टिक टँकमध्ये पडून दोन कामगारांचा मृत्यू

वंदे भारत गाड्यांमध्ये अर्धा लिटर पाण्याच्या बाटल्या मिळणार

उद्धव ठाकरेंच्या 'अभद्र' वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं सडेतोड उत्तर

कोटक महिंद्रा बँकेवर RBI ची कारवाई, क्रेडिट कार्ड जारी करण्यास बंदी

75 फूट उंचीवरून महिला थेट ज्वालामुखीत पडली, मृत्यू

ब्रिटिश संसदेने रवांडा निर्वासन विधेयक मंजूर केले

मलेशियामध्ये दोन नौदलाचे हेलिकॉप्टरची जोरदार धडक सर्व 10 क्रू मेंबर्स ठार

IPL 2024: 56 चेंडूत शतक झळकावून रुतुराज गायकवाडने इतिहास रचला

LSG vs CSK : मार्कस स्टॉइनिसने IPL मधील 13 वर्षे जुना विक्रम मोडला

टेनिस स्टार नोव्हाक जोकोविचची वर्षातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून 5 व्यांदा निवड

पुढील लेख
Show comments