Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मोबाईल क्रमांक बँकेकडे रजिस्टर करा, एसबीआयचे आवाहन

Webdunia
सोमवार, 15 ऑक्टोबर 2018 (10:20 IST)
स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या खातेदारांपैकी जे खातेदार इंटरनेट बँकींग सुविधा वापरतात त्यांनी लवकरात लवकर आपला मोबाईल क्रमांक बँकेकडे रजिस्टर करावा असे आवाहन बँकेने केले आहे. यासाठी बँकेने १ डिसेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. असे न केल्यास बँक प्रशासनाकडून ग्राहकांची नेट बँकींग सुविधा बंद केली जाईल असेही बँकेकडून सांगण्यात आले आहे. बँकेने ‘ऑनलाइनसेबी’ या आपल्या संकेसस्थळावर ग्राहकांना ही माहिती दिली आहे.
 
आपल्या ग्राहकांना एसएमएसेस आणि इमेल अलर्टसाठी मोबाइल क्रमांक रजिस्टर करायला सांगा, असे निर्देश रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ६ जुलै २०१७ रोजी एका निवदनाद्वारे बँकांना दिले होते. त्या पार्श्वभूमीवर एसबीआयने आपल्या ग्राहकांना ही सूचना दिली आहे. सध्या व्यवहार ऑनलाईन झाल्यापासून ग्राहकांकडून नेटबँकींगचा मोठ्या प्रमाणात वापर होते. ऑनलाईन व्यवहार करताना कोणतेही गैरप्रकार घडू नयेत म्हणून सुरक्षेच्या कारणास्तव बँकेने या नियमाची अंमलबजावणी करण्याचे ठरवले आहे. यासाठी ग्राहकांनी आपले खाते असलेल्या शाखेशी संपर्क करणे आवश्यक असल्याचेही बँकेने म्हटले आहे.
 
आपला मोबाईल क्रमांक रजिस्टर आहे की नाही असे तपासा
 
१. www.onlinesbi.com वर जाऊन लॉगइन करा
२. My Account and Profile वर जा
३. यातील Profile वर जा
४. यात Personal Details मध्ये मोबाईल या पर्यायावर क्लिक करा.
५. तुम्हाला प्रोफाईल पासवर्ड मागितला जाईल. हा लॉगइन पासवर्डपेक्षा वेगळा असेल.
६. योग्य पासवर्ड टाकल्यावर तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी दिसेल.

संबंधित माहिती

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

पुढील लेख
Show comments