Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कांद्याचे भाव हे चाळीशी पार गेले

Webdunia
शुक्रवार, 12 फेब्रुवारी 2021 (07:55 IST)
कांदा उत्पादकांना चांगले दिवस येणार आहेत. तर गृहिणी आणि सर्वसामान्य नागरिकांचं बजेट चांगलंच कोलमडण्याची शक्यता आहे. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात कांद्याचे भाव हे चाळीशी पार गेले आहेत.
 
नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट मध्ये कांद्याचे दर 40 ते 42 रुपयांपर्यंत पोहोचलेत. मागील वर्षी झालेल्या अवकाळी पावसाचा परिणाम कांदा उत्पादनावर झाला आहे. कांद्याचे उत्पादन कमी झाल्याने पहिल्यांदाच फेब्रुवारी महिन्यात सामान्य नागरिकांना कांदा चढ्या दरात खरेदी करावा लागत आहेत.
 
फेब्रुवारी अखेर पर्यंत हे दर वाढलेलेच राहणार असून नवीन उत्पादन यायला मार्च ते एप्रिल महिन्यापर्यंत वाट पहावी लागणार आहे. त्यामुळे पुढील महिने चढ्या दरानेच कांदा खरेदी करावा लागणार आहे.
 
सध्या बाजारपेठेत नगर,पुणे आणि नाशिक मधून कांदा येत असून कांद्याचे भाव वाढल्याने गुजरातधून पांढरा कांदा देखील बाजारात येत आहे. या कांद्याला 20 ते 22 रुपये किलो भाव मिळत आहे. हा कांदा स्वस्त असला तरी त्याला उठाव नसल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे लाल कांद्याची मागणी वाढली असल्यानं तो चढ्या दरानं विकला जात आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chaitra Navratri 2025 भारतातील दहा प्रमुख श्रीराम मंदिर

Gudi Padwa 2025 Rangoli Designs गुढीपुढे काढण्यासाठी रांगोळी डिझाईन

हिंदू नववर्षापूर्वी घरातून बाहेर काढून टाका या ७ वस्तू, जीवनात सुख-समृद्धी येईल

फाटलेले ओठ गुलाबी करण्यासाठी नारळाच्या तेलात हे मिसळून लावा

नारळ पाणी कोणी पिऊ नये पिण्यापूर्वी त्याचे तोटे जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

मुंबईमध्ये 'इफ्तारी' वाटण्यावरून वाद, एकाची चाकूने भोसकून हत्या

नागपुरात पत्नीने पतीचे काळे कृत्य उघड करून त्याला तुरुंगात टाकले

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता, येलो-ऑरेंज अलर्ट जारी

शिर्डी : साई भक्तांसाठी आनंदाची बातमी! शिर्डी विमानतळावर नाईट लँडिंग सुरू

भंडारा येथे वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, ग्रामस्थांमध्ये घबराट

पुढील लेख
Show comments