Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कांद्याचे भाव हे चाळीशी पार गेले

Webdunia
शुक्रवार, 12 फेब्रुवारी 2021 (07:55 IST)
कांदा उत्पादकांना चांगले दिवस येणार आहेत. तर गृहिणी आणि सर्वसामान्य नागरिकांचं बजेट चांगलंच कोलमडण्याची शक्यता आहे. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात कांद्याचे भाव हे चाळीशी पार गेले आहेत.
 
नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट मध्ये कांद्याचे दर 40 ते 42 रुपयांपर्यंत पोहोचलेत. मागील वर्षी झालेल्या अवकाळी पावसाचा परिणाम कांदा उत्पादनावर झाला आहे. कांद्याचे उत्पादन कमी झाल्याने पहिल्यांदाच फेब्रुवारी महिन्यात सामान्य नागरिकांना कांदा चढ्या दरात खरेदी करावा लागत आहेत.
 
फेब्रुवारी अखेर पर्यंत हे दर वाढलेलेच राहणार असून नवीन उत्पादन यायला मार्च ते एप्रिल महिन्यापर्यंत वाट पहावी लागणार आहे. त्यामुळे पुढील महिने चढ्या दरानेच कांदा खरेदी करावा लागणार आहे.
 
सध्या बाजारपेठेत नगर,पुणे आणि नाशिक मधून कांदा येत असून कांद्याचे भाव वाढल्याने गुजरातधून पांढरा कांदा देखील बाजारात येत आहे. या कांद्याला 20 ते 22 रुपये किलो भाव मिळत आहे. हा कांदा स्वस्त असला तरी त्याला उठाव नसल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे लाल कांद्याची मागणी वाढली असल्यानं तो चढ्या दरानं विकला जात आहे. 

संबंधित माहिती

महिला PSI ने केस बंद करण्यासाठी लाच मध्ये मागितला मोबाईल, नकली फोन घेऊन पोहचले ACB ऑफिसर

मी घाबरत नाही, नवनीत राणा म्हणाल्या जो कोणी पाकिस्तानसाठी काम करतो त्याला मी उत्तर देईन

शिवसेना(युबीटी)च्या रॅलीमध्ये होता1993 चा मुंबई बॉंम्ब स्फोटचा आरोपी, भाजपचा मोठा आरोप

मणिशंकर अय्यरचे पाकिस्तान प्रेम, लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसमध्ये वाढली समस्या

निवडणूक महत्वाचे काम आहे तर कायद्याचे पालन होणार नाही का? मुंबई हाय कोर्टाचा निवडणूक आयोगाला प्रश्न

Gold-Silver Price Update: अक्षय्य तृतीयापूर्वी सोनं झालं स्वस्त!

Russia-ukraine war : रशिया-युक्रेन संघर्षात श्रीलंकेच्या आठ सैनिकांचा मृत्यू

उपांत्यपूर्व फेरीत मनिका बत्रा जपानच्या हिना हयाता कडून पराभूत

IND W vs BAN W: भारतीय महिला संघाने बांगलादेशचा पाचव्या सामन्यात 21 धावांनी पराभव केला

Air India : एअर इंडिया एक्सप्रेसच्या केबिन क्रूने संप मागे घेतला

पुढील लेख
Show comments